शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
3
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
4
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
5
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
6
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
7
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
8
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
9
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
10
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
11
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
12
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
13
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
14
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
15
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
16
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
17
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
18
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
19
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
20
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

संतप्त ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:22 IST

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाºयांना घेराव घातला.

ठळक मुद्देमौदी पुनर्वसन येथील घटना : मागणीच्या पूर्ततेसाठी नागरिक ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाऱ्यांना घेराव घातला.भंडारा जिल्ह्यातील पुनर्वसनासह प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. नागरी सुविधांचा वाणवा कायम आहे. पुनर्वसन क्षेत्रातील समस्या तात्काळ सोडविण्याचे गाजर शासन प्रशासन दाखवित आल्याने ग्रामस्थांचाही संयम सुटत आहे. मौदी पुनर्वसनात अशाच नागरी सुविधांचा अभाव आहे. वीजेच्या बाबतीत पुनर्वसनात समस्या उद्भवल्या आहेत.मौदी पुनर्वसनात एकुण ७४ वीज ग्राहक असून मागील वर्षभरापासून एकही वीजधारकाने विद्युत बिल भरलेले नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पुनर्वसनातील वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चमू पुनर्वसनस्थळी पोहचली. विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळेच वीज पुरवठा खंडीत केल्याची माहिती पहेला वीज वितरण उपकेंद्राचे सहायक अभियंता एस. के. गजभिये यांनी दिली. सकाळी ११ वाजतापासून अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी विद्युत रोहित्राजवळच विद्युत अधिकारी व कर्मचाºयांना घेराव घातला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामवासीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चु कडू यांनी, जेव्हापर्यंत पुनर्वसन क्षेत्रातील ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत, असे म्हटले आहे.आश्वासन नको रोजगार द्याशासनाने नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुनर्वसन क्षेत्रातील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली होती. याच विषयाला घेवून ग्रामवासीयांनी बुधवारी एल्गार पुकारला. रोजगार उपलब्ध करुन देणार नाही. तोपर्यंत कुठलाही शासकीय कर किंवा देयकाचा भरणा करणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच आगामी निवडणुकीतही मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठाम निर्धारही ग्रामवासीयांनी यावेळी व्यक्त केला.