शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:22 IST

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाºयांना घेराव घातला.

ठळक मुद्देमौदी पुनर्वसन येथील घटना : मागणीच्या पूर्ततेसाठी नागरिक ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाऱ्यांना घेराव घातला.भंडारा जिल्ह्यातील पुनर्वसनासह प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. नागरी सुविधांचा वाणवा कायम आहे. पुनर्वसन क्षेत्रातील समस्या तात्काळ सोडविण्याचे गाजर शासन प्रशासन दाखवित आल्याने ग्रामस्थांचाही संयम सुटत आहे. मौदी पुनर्वसनात अशाच नागरी सुविधांचा अभाव आहे. वीजेच्या बाबतीत पुनर्वसनात समस्या उद्भवल्या आहेत.मौदी पुनर्वसनात एकुण ७४ वीज ग्राहक असून मागील वर्षभरापासून एकही वीजधारकाने विद्युत बिल भरलेले नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पुनर्वसनातील वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चमू पुनर्वसनस्थळी पोहचली. विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळेच वीज पुरवठा खंडीत केल्याची माहिती पहेला वीज वितरण उपकेंद्राचे सहायक अभियंता एस. के. गजभिये यांनी दिली. सकाळी ११ वाजतापासून अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी विद्युत रोहित्राजवळच विद्युत अधिकारी व कर्मचाºयांना घेराव घातला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामवासीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चु कडू यांनी, जेव्हापर्यंत पुनर्वसन क्षेत्रातील ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत, असे म्हटले आहे.आश्वासन नको रोजगार द्याशासनाने नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुनर्वसन क्षेत्रातील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली होती. याच विषयाला घेवून ग्रामवासीयांनी बुधवारी एल्गार पुकारला. रोजगार उपलब्ध करुन देणार नाही. तोपर्यंत कुठलाही शासकीय कर किंवा देयकाचा भरणा करणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच आगामी निवडणुकीतही मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठाम निर्धारही ग्रामवासीयांनी यावेळी व्यक्त केला.