शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

संतप्त ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:22 IST

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाºयांना घेराव घातला.

ठळक मुद्देमौदी पुनर्वसन येथील घटना : मागणीच्या पूर्ततेसाठी नागरिक ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाऱ्यांना घेराव घातला.भंडारा जिल्ह्यातील पुनर्वसनासह प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. नागरी सुविधांचा वाणवा कायम आहे. पुनर्वसन क्षेत्रातील समस्या तात्काळ सोडविण्याचे गाजर शासन प्रशासन दाखवित आल्याने ग्रामस्थांचाही संयम सुटत आहे. मौदी पुनर्वसनात अशाच नागरी सुविधांचा अभाव आहे. वीजेच्या बाबतीत पुनर्वसनात समस्या उद्भवल्या आहेत.मौदी पुनर्वसनात एकुण ७४ वीज ग्राहक असून मागील वर्षभरापासून एकही वीजधारकाने विद्युत बिल भरलेले नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पुनर्वसनातील वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चमू पुनर्वसनस्थळी पोहचली. विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळेच वीज पुरवठा खंडीत केल्याची माहिती पहेला वीज वितरण उपकेंद्राचे सहायक अभियंता एस. के. गजभिये यांनी दिली. सकाळी ११ वाजतापासून अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी विद्युत रोहित्राजवळच विद्युत अधिकारी व कर्मचाºयांना घेराव घातला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामवासीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चु कडू यांनी, जेव्हापर्यंत पुनर्वसन क्षेत्रातील ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत, असे म्हटले आहे.आश्वासन नको रोजगार द्याशासनाने नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुनर्वसन क्षेत्रातील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली होती. याच विषयाला घेवून ग्रामवासीयांनी बुधवारी एल्गार पुकारला. रोजगार उपलब्ध करुन देणार नाही. तोपर्यंत कुठलाही शासकीय कर किंवा देयकाचा भरणा करणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच आगामी निवडणुकीतही मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठाम निर्धारही ग्रामवासीयांनी यावेळी व्यक्त केला.