शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

शेकडो ग्रामस्थांसाठी ‘त्या’ ठरल्या ‘देवदूत’

By admin | Updated: December 14, 2015 00:34 IST

गाव तिथ रस्ता, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र, गोसेखुर्द प्रकल्पामुळे दवडीपार-कोरंभी मार्गावरील पुलावरून

दवडीपार-कोरंभी मार्गाची दैनावस्था : बंद मार्गावरून सुरू झाली वाहतूकभंडारा : गाव तिथ रस्ता, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र, गोसेखुर्द प्रकल्पामुळे दवडीपार-कोरंभी मार्गावरील पुलावरून बाराही महिने पाणी राहत असते. येथून मार्गक्रमण करताना नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत होता. याची जिल्हा परिषद सदस्य जया यशवंत सोनकुसरे यांनी दखल घेत बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलावर मुरूमाचे भरण भरले. आता या मार्गावरून वाहतूक सुरू झाली असून ग्रामस्थांसाठी 'जया' देवदूत ठरल्या आहेत.राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्दमुळे जिल्ह्यातील अनेक गावांचे पूनर्रवसन झाले. यातीलच दवडीपार या गावाला अंशता बाधीताचा फटका बसला आहे. दवडीपारवासीयांचा शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा आहे. या गावाला चारही बाजूंनी मोठे नाले आहेत. त्यामुळे गाव पाण्याने वेढलेले असते. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी अडविल्याने गावाला जोडलेले दोन मार्ग पाण्याखाली आहेत. दवडीपार-कवळशी, दवडीपार-कोरंभी हे मार्ग पाण्याखाली राहतात. तर दवडीपार-बेला रस्ता अतीवृष्टीमुळे बंद पडतो. गोसे पूनर्वसन विभागाने या तिन्ही मार्गाची उंची वाढवून मार्गावर पुल बांधकामाचा प्रस्ताव पाठविला. मात्र, फाईल शासनदरबारी धूळखात पडली आहे. दवडीपार-कोरंभी मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना नाल्यापलीकडे शेती किंवा अन्य कामांसाठी जाताना जीव मुठीत घेवून जावे लागत होते. याची जाणीव शिवसेनेचे पंचायत समिती उपसभापती ललीत बोंद्रे, यशवंत टिचकुले यांनी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांना करून दिली. सोनकुसरे यांनी घटनास्थळाला भेट देवून कार्यकारी अभियंता अनिल खडसे, उपअभियंता शेंडे व गोसे अधिकाऱ्यांना पुलावर मुरूमाचा भरणा करण्याचे सुचविले. अधिकाऱ्यांनी पुलावर पाच ते सहा फुट मुरूमाचे भरण भरून मागील दोन वर्षांपासून बंद असलेला मार्ग पूर्ववत सुरू केला. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने त्या ग्रामस्थांसाठी देवदूत ठरल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)