शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अन् तिच्या मृत्यूने भावंडं झाली अनाथ

By admin | Updated: April 19, 2016 00:30 IST

जीवनात वेळ आणि काळ या दोन गोष्टी एकत्र आल्यास कोणावर कोणता प्रसंग ओढवेल हे सांगायची गरज नाही.

समाजमन गहिवरले : गरज दानशुरांच्या मदतीचीगिरीधर चारमोडे मासळजीवनात वेळ आणि काळ या दोन गोष्टी एकत्र आल्यास कोणावर कोणता प्रसंग ओढवेल हे सांगायची गरज नाही. काळ कोणावर केव्हा वक्रदृष्टी घालेल हे सांगता येत नाही. असाच काळाने क्रूर खेळ दोन निरागस भावंडाच्या जन्मदात्रीसोबत केला. स्थानिक आंबेडकर वॉर्डातील सीमा श्रीकृष्ण बनकर (२९) हिचा अचानक झोपेतच मृत्यू झाला आणि तिचे दोन्ही मुले क्षणात अनाथ झाली. पाषाणालाही पाझर फुटावा, अशी ही घटना सध्या पंचक्रोशीत चर्चेत आहे.सीमा श्रीकृष्ण बनकर ही पोटच्या दोन मुलांना घेऊन, घरात अठराविश्व दारिद्रय असताना, त्यांच्या भविष्याचे स्वप्न रंगवत जगत होती. श्रेयश श्रीकृष्ण बनकर (४ वर्षे) व तेजस श्रीकृष्ण बनकर (दीड वर्ष) अशी तिची ही दोन मुले. लहान मुल पोटात असतानाच पतीचे आकस्मिक निधन झाले.पितृछाया गेल्यामुळे, मोलमजुरी करून, मोठ्या धैर्याने तिने संसाराचा गाडा पुढे नेत मुलांना मोठे केले. विधवा असूनही तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. सासु सासरे केव्हाचेच हे जग सोडून गेले होते. आता तिच एक तिच्या मुलांचा आधारवड म्हणून जगत होती. परंतु नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती.काल रोजच्या प्रमाणे कामावरून आली. बाजुच्याच शिंप्याकडे ब्लाऊज शिवायला दिले होेते. रात्री जेवनानंतर शेजारील नाजुक रणभीड माटे या महिलेशी गप्पा केल्या व नंतर दोन्ही मुलांना घेवून झोपी गेली. पण पहाटेच तिची प्राणज्योत मावळली. मनमिळावू स्वभावाची सीमा अचानक, काहीच प्रकृतीचा कारण नसताना निघून गेली. तिची दोन्ही मुले क्षणातच अनाथ झाली. तिच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असतानाच त्या अनाथ झालेल्या भावंडाचे आता काय, असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडावर येत होता. अगदी दोन वर्षात अचानक पती पत्नीच्या अकाली मृत्युमुळे श्रेयस व तेजस या निष्पाप मुलांवरचे मातृपितृ छत्र हरवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. जवळचा कोणीच नातेवाईक नसल्याने दोन्ही भावंडाचा आता पालन पोषण कोण करणार असा जेव्हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा शेजारील नाजुक रणभीड माटे, या महिलेने या दोन भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचे धाडस दाखविले.पण जीवन हे लहान नाही. त्या मुलांवरील छत्र हरपल्याने त्यांचा उदरनिर्वाहा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, केवळ तिच्या जाण्याने आता गरज आहे ती समाजातील दानशूर म्हणविणाऱ्या खऱ्या दानशुरांची, योग्य संगोपनाची व निष्पाप मुलांच्या पुनर्वसनाची गरज आहे. एका व्यक्तीची मदत पुरेशी ठरणार नाही तर समाजातील प्रत्येक घटकाचा हातभार लागल्याशिवाय पर्याय नाही.