शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अन् तिच्या मृत्यूने भावंडं झाली अनाथ

By admin | Updated: April 19, 2016 00:30 IST

जीवनात वेळ आणि काळ या दोन गोष्टी एकत्र आल्यास कोणावर कोणता प्रसंग ओढवेल हे सांगायची गरज नाही.

समाजमन गहिवरले : गरज दानशुरांच्या मदतीचीगिरीधर चारमोडे मासळजीवनात वेळ आणि काळ या दोन गोष्टी एकत्र आल्यास कोणावर कोणता प्रसंग ओढवेल हे सांगायची गरज नाही. काळ कोणावर केव्हा वक्रदृष्टी घालेल हे सांगता येत नाही. असाच काळाने क्रूर खेळ दोन निरागस भावंडाच्या जन्मदात्रीसोबत केला. स्थानिक आंबेडकर वॉर्डातील सीमा श्रीकृष्ण बनकर (२९) हिचा अचानक झोपेतच मृत्यू झाला आणि तिचे दोन्ही मुले क्षणात अनाथ झाली. पाषाणालाही पाझर फुटावा, अशी ही घटना सध्या पंचक्रोशीत चर्चेत आहे.सीमा श्रीकृष्ण बनकर ही पोटच्या दोन मुलांना घेऊन, घरात अठराविश्व दारिद्रय असताना, त्यांच्या भविष्याचे स्वप्न रंगवत जगत होती. श्रेयश श्रीकृष्ण बनकर (४ वर्षे) व तेजस श्रीकृष्ण बनकर (दीड वर्ष) अशी तिची ही दोन मुले. लहान मुल पोटात असतानाच पतीचे आकस्मिक निधन झाले.पितृछाया गेल्यामुळे, मोलमजुरी करून, मोठ्या धैर्याने तिने संसाराचा गाडा पुढे नेत मुलांना मोठे केले. विधवा असूनही तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. सासु सासरे केव्हाचेच हे जग सोडून गेले होते. आता तिच एक तिच्या मुलांचा आधारवड म्हणून जगत होती. परंतु नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती.काल रोजच्या प्रमाणे कामावरून आली. बाजुच्याच शिंप्याकडे ब्लाऊज शिवायला दिले होेते. रात्री जेवनानंतर शेजारील नाजुक रणभीड माटे या महिलेशी गप्पा केल्या व नंतर दोन्ही मुलांना घेवून झोपी गेली. पण पहाटेच तिची प्राणज्योत मावळली. मनमिळावू स्वभावाची सीमा अचानक, काहीच प्रकृतीचा कारण नसताना निघून गेली. तिची दोन्ही मुले क्षणातच अनाथ झाली. तिच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असतानाच त्या अनाथ झालेल्या भावंडाचे आता काय, असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडावर येत होता. अगदी दोन वर्षात अचानक पती पत्नीच्या अकाली मृत्युमुळे श्रेयस व तेजस या निष्पाप मुलांवरचे मातृपितृ छत्र हरवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. जवळचा कोणीच नातेवाईक नसल्याने दोन्ही भावंडाचा आता पालन पोषण कोण करणार असा जेव्हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा शेजारील नाजुक रणभीड माटे, या महिलेने या दोन भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचे धाडस दाखविले.पण जीवन हे लहान नाही. त्या मुलांवरील छत्र हरपल्याने त्यांचा उदरनिर्वाहा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, केवळ तिच्या जाण्याने आता गरज आहे ती समाजातील दानशूर म्हणविणाऱ्या खऱ्या दानशुरांची, योग्य संगोपनाची व निष्पाप मुलांच्या पुनर्वसनाची गरज आहे. एका व्यक्तीची मदत पुरेशी ठरणार नाही तर समाजातील प्रत्येक घटकाचा हातभार लागल्याशिवाय पर्याय नाही.