शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

अन् डोळे अश्रुंनी पाणावले...

By admin | Updated: December 20, 2014 00:41 IST

शहरातील साई मंदिर मार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत अनेक छोट्या व्यावसायीकांनी दुकानदारी थाटली होती.

भंडारा : शहरातील साई मंदिर मार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत अनेक छोट्या व्यावसायीकांनी दुकानदारी थाटली होती. मात्र आज शुक्रवारला पालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सुचना न देता अचानक त्यांच्या दुकानांवर अतिक्रमण हटावचा बडगा उगारला. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येणार असल्याने व्यावसायीकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गाव असो वा शहर, प्रत्येक ठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजुला छोटी-मोठी दुकाने थाटून संसार चालविणारे अनेक आहेत. फुटपाथ म्हटल्या जाणाऱ्या या जागांवर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये दुचाकी दुरूस्ती करणारे, हॉटेल व्यावसायीक, चॉयनिल चालक, भेलपूरी व गुपचुप हातठेलाधारक, मुर्तीकार व पेंटर, कपडे प्रेस करणारा, देवांसाठी हार बनविणारे व पाणठेला व्यावसायीकांचा समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गा असलेल्या जिल्हा परिषद चौकातील तुमसर राज्य मार्गालगत असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीलगत या व्यावसायीकांनी आपल्या दुकानदाऱ्या थाटल्या. मागील काही दिवसांपासून या दुकानांच्या माध्यमातून या व्यावसायीकांनी त्यांचा संसाराला आकार दिला. यातुन त्यांनी आर्थिक प्रगती करून कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या मार्गावर थाटलेल्या दुकानदारी एका 'क्लास वन' अधिकाऱ्याला खटकली. या अधिकाऱ्याच्या आदेशावरून पालिका प्रशासनाने अचानक आपला मोर्चा येथील अतिक्रमणधारकांच्या दुकानांकडे वळला. कुठल्याही प्रकारची पूर्वसुचना न देता या दुकानदारांना स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगून अतिक्रमीत दुकाने हटविण्याचे आदेश दिले. अचानक आलेल्या या तोंडी आदेशामुळे दुकानदारांवर आभाळ कोसळल्यागत झाले. पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक अचानक दुकानासमोर येऊन अतिक्रमणाचा बडगा उगारण्याचा प्रयत्न करीत असल्याने, दुकानदारांचे डोळे अश्रुंनी पाणावले. अनेक दिवसांपासून या दुकानांच्या माध्यमातून आनंदात संसार चालवून कुटूंबाचे पालनपोषण करणाऱ्या व्यावसायीकांवर यामुळे उपासमारीचे संकट ओढविणार आहे. या कारवाईने त्यांचा कुटूंबाची वाताहत होणार आहे. ज्या दुकानांनी त्यांना समाजात ताट मानेने जगण्याचे बळ दिले. त्या हातठेल्यांना मित्रमंडळींच्या सहकार्याने उचलून घरी नेण्याचा प्रसंग ओढवला. यावेळी त्यांचे कंठ दाटून आल्याचे चित्र दिसून आले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गावर असलेल्या रस्त्यालगत या व्यवसायीकांनी अतिक्रमण करुन दुकान थाटली होती. त्यांचे अतिक्रमण बांधकाम विभागाने काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेवून दुकानांवर बडगा उगारला. या कारवाई दरम्यान बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी तिथे नसल्याने कारवाईबाबत शंकेला पेव फुटले. नगर पालिकेचे फक्त तीन कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ढूंकूनही न बघितल्याने या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण स्पष्ट झळकत होता. फक्त तीन कर्मचाऱ्यांचा खांद्यावर अतिक्रमण निर्मुलनाचा डोलारा पेलविण्यात आला होता. त्यांच्या सुरक्षेसाठी दोन पोलिस कर्मचारी तैनात होते. जनक्षोभ उसळला असता तर या तीन कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही अडचणीत आले असते. मात्र या अतिक्रमण निर्मुलनाची फिकीर वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसावी असेच आजच्या मोहिमे दरम्यान जाणवले.पाषण हृदयी प्रशासनाला ‘हातावर कमविणे, पानावर खाणाऱ्या’ हाडमासाच्या इसमावर दया आली नाही. नियोजन न करता अतिक्रमण निर्मुलनाची मोहिम राबविणे हे कितपत योग्य आहे. असा सवाल ही फुटपाथ दुकानदार विचारत होते. त्यांची रोजीरोटी तर बुडालीच त्याजोगे भविष्याची चिंताही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. (शहर प्रतिनिधी)