शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

समाज निर्मितीसाठी झटणारी ही आंबेडकरी जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:30 IST

सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे.

ठळक मुद्देमा. प. थोरात : लाखनी येथे दुसरे आंबेडकरी साहित्य संमेलन, शहरातून काढला संविधान मार्च

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : सर्व बाजूंनी मिळणाऱ्या द्रव्याचे अंग घेऊनच सर्व सजीव -निर्जीव अस्तित्वांचे प्रकार उत्पन्न झाले आहेत. जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडितावस्थेत आहे. सर्व मानवाला समान स्वातंत्र व समान न्याय असलाच पाहिजे. या सृृष्टीवर आधारलेला मानव समाज असायला पाहिजे, असे मानणारी व समाज निर्मितीसाठी झटणारी जावीव हीच आंबेडकरी जाणीव आहे, असे प्रतिपादन डॉ. मा. प. थोरात यांनी केले.स्थानिक स्वप्नीदप सभागृहात दुसरे वैदर्भिय आंबेडकरी साहित्य संमेलन शनिवारपासून आयोजित करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. थोरात बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ई.झेड. खोब्रागडे संमेलनाचे पूर्वाध्यक्ष विजयकुमार गवई, संमेलनाध्यक्ष डॉ.मा.प. थोरात, स्वागताध्यक्ष ह.ध. बोरकर उपस्थित होते.संमेलनानिमित्त महाप्रज्ञा बौद्ध विहारापासून संविधान मार्च काढण्यात आला. याप्रसंगी भगवान सुखदेवे यांचे धम्मपाठ, धर्मांतरित बौद्धांची संस्कृति आणि संस्कार व सी.एम. बागडे यांचे भीमा कोरेगावचे युद्ध अर्थात इतिहासाचे सोनेरे पान, डॉ.सुरेश खोब्रागडे यांचे वेळेवर येणारे इतर विषय, गजेंद्र गजभिये यांच्या सजग प्रहरी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक सी.एम. बागडे यांनी केले. संमेलनाची भूमिका अशोक बुरबुरे यांनी मांडली.अध्यक्षीय भाषणात डॉ.थोरात यांनी आंबेडकर वाद हा स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाशी आणि स्वतंत्र आहे. आस्वादकान, अभ्यासकात जागृत करण्याची क्षमता आंबेडकरी साहित्यात आहे, असेही ते म्हणाले. गांधीवाद आणि मार्क्सवादात अस्तित्वासंबंधीचा संपूर्ण बोध होतनाही. बुद्धाचा विचार स्वीकारणाºया आंबेडकरांच्या तत्वज्ञानात कालावकाशरहित अस्तित्व मांडलेले आहे. आणि या अस्तित्वाला सिद्ध करणाºया आधुनिक विज्ञानातील ज्ञानाच्या सहाय्याने मानव विश्वातील समता-बंधूता-स्वातंत्र-न्याय भावावर उभारलेल्या मानव समाजाची रचना अहिंसकपणे निर्माण केल्यानेच शोषणरहित मानव समाजाची निर्मिती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराद्वारे करता येऊ शषते. असे विचारही त्यांनी व्यक्त केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन भगवान सुखदेवे यांनी केले.