शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

डिझेलचे दर घटले तरी एसटीचे दर कायमच

By admin | Updated: December 24, 2014 22:53 IST

जेव्हा-जेव्हा डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली, तेव्हा-तेव्हा राज्य परिवहन महामंडळाने एस.टी.ची भाडेवाढ केली आहे. मागील सात महिन्यात डिझेलचे भाव चारवेळा कमी झाले. परंतु, परिवहन मंडळाने

भाव कमी होऊनही स्थिती ‘जैसे थे’ : राज्य परिवहन महामंडळाविरुद्ध प्रवाशांमध्ये कमालिचा संतापइंद्रपाल कटकवार - भंडारा जेव्हा-जेव्हा डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली, तेव्हा-तेव्हा राज्य परिवहन महामंडळाने एस.टी.ची भाडेवाढ केली आहे. मागील सात महिन्यात डिझेलचे भाव चारवेळा कमी झाले. परंतु, परिवहन मंडळाने तिकिटाच्या दरात कोणतीही घट केलेली नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या या महामंडळाकडून प्रवाशांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात आलेला नाही. आठ ते दहा रूपयांनी डिझेलचे भाव कमी झाल्यामुळे एसटीचे दर कमी व्हायला पाहिजे होते. परंतु महामंडळाने दर कमी केलेले नाही. त्यामुळे एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी की लुटीसाठी हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला अहे.‘गाव तिथे एसटी’ ही संकल्पना साधत राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. प्रवाशांसाठजी आजमितीला जवळपास १४ प्रकारच्या सवलती योजना कार्यान्वित आहेत. यात आर्थिक स्थितीला अनुसरून प्रवाशी त्या योजनांचा लाभही घेत आहेत. १४ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे आहेत. भंडारा विभागातंर्गत सहा आगार असून त्यात भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी व साकोली तर गोंदिया जिल्ह्यात तिरोडा आणि गोंदिया आगाराचा समावेश आहे.एसटीला ‘लोकवाहिनी असेही संबोधले जाते. एसटीचा प्रवास ‘सुरक्षित प्रवास’ असेही म्हटले जाते. एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे एसटीची दररोजची उलाढाल लाखोंच्या घरात आहे. मात्र मागीलवर्षी डिझेलची दरवाढ होताच महामंडळानेही एसटीची भाडेवाढ केली होती. मागीलवर्षी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१३ रोजी एसटीने पहिली दरवाढ केली होती. यात त्यावेळी प्रति सहा किलोमीटर मागे १५ पैशांची (जलद व साधारण बस) तर निमआराम बसच्या प्रवाशात २० पैशांनी दरवाढ करण्यात आली होती. चारवेळा भाडेवाढयावर्षी ७ मार्च २०१४ रोजी जलद व साधारण बसच्या भाड्यात पुन्हा १५ पैसे तर निमआराम बसच्या प्रवाशात २० पैशांनी दरवाढ करण्यात आली होती. सन २०१४ मध्ये १ जून, ३१ जुलै आणि २२ आॅगस्ट रोजी एसटीने भाडेवाढ केली. डिझेलचे भाव कमी होत असताना एसटी महामंडळाने दरवाढ करण्याचा सपाटा मात्र कायम ठेवला. तांत्रिक कारण आणि वित्तीय तुट भरून काढण्यासाठी हा प्रयत्न असला तरी त्याचा फटका सरळसरळ प्रवाशांच्या खिशावर बसला. त्यामुळे प्रवाशांमध्येही असंतोष आहे.