शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिक्षकांना ॲन्टिजेन चाचणीची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांची चाचणी कधी होणार आणि शाळा सुरू कशा करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआर चाचणीशिवाय शाळेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : प्रतिबंधित क्षेत्रासह लक्षणे असणाऱ्यांचीच आरटीपीसीआर

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास महत्वाचा अडसर ठरलेली आरटीपीसीआर चाचणी ऐवजी आता ॲन्टिजेन चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र भंडारा शहर, जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कोविड अनुशंगाने लक्षणे असणाऱ्यांना मात्र आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सोमवारी याबाबत आदेश निर्गमित केल्यानंतर शिक्षकांचा जीव भांड्यात पडला. मंगळवारी अनेक शिक्षकांनी आपली ॲन्टीजेन चाचणी करण्यासाठी कोरोना केअर सेंटरवर धाव घेतली. जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांची चाचणी कधी होणार आणि शाळा सुरू कशा करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआर चाचणीशिवाय शाळेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाच शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देशित केले होते. आरटीपीसीआर चाचणी करून अहवाल येण्यास मोठा विलंब लागण्याची शक्यता होती. अशा स्थितीत मुलांना शाळेत पाठवावे की नाही, अशी चिंता पालाकांना तर शाळा व्यवस्थापन समितीमध्येही गोंधनाळी स्थिती निर्माण झाली होती.दरम्यान शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी ॲन्टीजेन चाचणी संदर्भात मागणी केली होती. यावरून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ॲन्टीजेण चाचणी करण्यास मुभा दिली. ॲन्टीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देशित केले. मात्र भंडारा शहर, जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रातील आणि कोविडची लक्षणे आढळणाऱ्या  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मात्र आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

२०२ शाळा सुरू  जिल्ह्यात पहिल्या दिवशी शाळा सुरू करताना काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी मात्र स्थिती सामान्य होवून जिल्ह्यात २०२ शाळा सुरू झाल्या. जिल्ह्यात ३४२ शाळा असून तेथे ६६ हजार ५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तर ३१४८ शिक्षक कार्यरत आहेत. आता ॲन्टीजेन चाचणी होणार असल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रशासनाने ॲन्टीजेन चाचणी करण्याची परवाणगी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक ॲन्टीजेन चाचणी करीत आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्व नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. -संजय डोर्लीकर,             शिक्षणाधिकारी, भंडारा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcollectorजिल्हाधिकारी