शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

युतीच्या काडीमोडने आघाडीची वाढणार ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असून बहुतांश पंचायत समितीमध्येही अशीच स्थिती आहे. परिणामी आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी अधिक बळकट होऊन भाजपची पिछेहाट होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जिल्हा भाजपमुक्त झाला आहे.

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्था : जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्टÑवादीला स्पष्ट बहुमत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सत्तेच्या संघर्षात भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाला असला तरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असून बहुतांश पंचायत समितीमध्येही अशीच स्थिती आहे. परिणामी आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी अधिक बळकट होऊन भाजपची पिछेहाट होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जिल्हा भाजपमुक्त झाला आहे.येथील जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेची युती तुटल्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. ५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस १९, राष्ट्रवादी १५, भाजप १३ आणि अपक्ष पाच असे संख्याबळ आहे. शिवसेनेचा एकही सदस्य सभागृहात नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची येथे युती असून काँग्रेसकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद आहे. प्रत्येकी दोन सभापतीपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला नऊ महिने अवधी आहे. युती तुटल्याने त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. उलट भाजपची येथे पिछेहाट होण्याची शक्यत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजप मुक्त झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षाने येथे बाजी मारली आहे. आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस असे सरकार येणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद निश्चितच वाढणार आहे. ग्रामीण भागात काँग्रेस-राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजली आहे. मात्र पाच वर्षात भाजप-शिवसेनेच्या सत्तेमुळे मरगळ आली होती. आता ती झटकली जाईल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्याचा निश्चितच परिणाम दिसणार आहे.जिल्ह्यातील पंचायत समितीची ही अशीच स्थिती आहे. सात पंचायत समित्यांमध्ये काही ठिकाणी युती आहे. मात्र राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. साकोली पंचायत समिती भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे येथे युती तुटण्याचा परिणाम जाणवणार नाही. तुमसर पंचायत समितीत भाजप आणि शिवसेनेची युती आहे. पंचायत समितीत भाजप ९, शिवसेना २, राष्ट्रवादी ७, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. येथील पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीप्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्या प्रवर्गातील एकमेव महिला सदस्य आहे. त्यामुळे युती तुटलीतरी राजकीय उलथापालथ होण्याची सुतराम शक्यता नाही.भंडारा पंचायत समितीत २० संख्याबळ असून दहा सदस्य भाजपचे आहेत. सध्या येथे भाजपची सत्ता आहे. गत वेळी ईश्वर चिठ्ठीने भाजपला सभापती पद मिळाले होते. शिवसेनेकडे केवळ दोनच संख्याबळ असल्याने युती तुटल्यानंतरही सत्तेचे समीकरणे जुळण्याची शक्यता नाही. त्यामुळे येथेही उलथापालथ होऊ शकत नाही. पवनी, लाखनी आणि लाखांदूर पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे स्पष्ट बहुमत असल्याने युती तुटल्याचा परिणाम होणार नाही. मोहाडी पंचायत समितीत शिवसेना आणि भाजपची सत्ता असली तरी भाजप बहुमतात आहे.एकंदरीत युतीचा काडीमोड झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणताही परिणाम जाणवणार नाही. उलट आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद वाढल्याचे दिसून येईल.काँग्रेस-राष्ट्रवादीला जिल्ह्यात संजीवनीभाजप-शिवसेना युतीच्या सत्ता काळात बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीने संजीवनी मिळाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षाने येथे बाजी मारली आहे. भाजपचा जिल्ह्यातून सफाया झाला आहे. आता शिवसेना आणि भाजपची युतीही तुटली आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. सोबतच राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होत आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यात उत्साह संचारल्याचे दिसत आहे. बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे तर शिवसेना ही जिल्ह्यात आता आपली पाळेमुळे रोवण्याच्या तयारीत आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभेत शिवसेनेला साथ दिली आहे. विधानसभेत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न आल्याने त्यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढविली होती. विशेष म्हणजे शिवसेनेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट निवडूण आल्यानंतर लगेच त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. आता जिल्ह्यात तीन पक्षाचे तीन आमदार आहेत. हे तिनही पक्ष राज्याच्या सत्तेत एकत्र येत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे चित्र कसे राहणार हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारण