शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

गरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. या केंद्रात सामान्य गरीब लोकांवर तातडीच्या वेळी भरती करून ...

गरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. या केंद्रात सामान्य गरीब लोकांवर तातडीच्या वेळी भरती करून उपचार केले जातात. तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व इतर कार्य आरोग्य केंद्रातर्फे चालविले जाते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावातील नाल्या तुडुंब भरले आहेत. दूषित पाणी प्यालाने पावसाळ्यात अतिसार व साथीचे आजार उद्भवत असतात. कोंढा येथील बुधाजी आळे व त्यांच्या कुटुंबात तीन लोकांना अतिसाराचा त्रास झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी व परीचारीका यांनी बुधाजी आळे यांना तुम्हाला सलाईन लागत नाही म्हणून घरी परत पाठविले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार न झाल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी योग्य उपचार केले असते तर त्यांचा प्राण वाचला असता असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण उपचारासाठी गेल्यास त्यांच्यावर थातूरमातूर उपचार करून त्यांना घरी परत पाठविले जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अतिसार व इतर रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यास त्यांच्यावर योग्य उपचार करावे, अशी मागणी कोंढा येथील ग्रामपंचायत सदस्य व तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमित जीभकाटे यांनी केली आहे.