शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सर्व यंत्रणांनी तातडीने अहवाल सादर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

वैनगंगा नदीत वाढणारी जलपर्णी वनस्पती हा भंडारावासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असून नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी सांगितले. यावर विचार करुन जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध होताच जलपर्णी वनस्पती निर्मूलनाचे काम करण्यात येणार आहे. तसेच पाणी शुध्दीकरणाचे कामही लवकरच करण्यात येईल.

ठळक मुद्देसंदीप कदम : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील सात मुद्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील सात मुद्दयांचा आढावा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. याप्रसंगी सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, संदीप भस्के, नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.नागनदीच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीचे पाणी दुषित होऊन त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यवर होतो. त्यावर संबंधित यत्रणेने त्वरित कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. एनटीपीसी कडून प्रस्ताव मान्यतेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व पाण्याचे जलशुध्दीकरण प्रक्रिया त्वरित करावी, असे ते म्हणाले.अवैध रेती वाहतूकीस आळा घालण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले असून यावर्षी चार कोटी ५३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच चेकपोस्ट लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.पर्यटन धोरणांतर्गत वन विभागाने रावणवाडी व पवनी येथील पर्यटन सुविधा करण्याचे काम सुरु असल्याचे तसेच जलसंपदा विभागाने गोसीखुर्द पर्यटन क्षेत्रासाठी १०५ कोटींचा प्रस्ताव सादर केला असून मान्यता मिळताच कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सांगण्यात आले.वैनगंगा नदीत वाढणारी जलपर्णी वनस्पती हा भंडारावासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असून नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी सांगितले. यावर विचार करुन जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध होताच जलपर्णी वनस्पती निर्मूलनाचे काम करण्यात येणार आहे. तसेच पाणी शुध्दीकरणाचे कामही लवकरच करण्यात येईल.या बैठकीत नागनदीच्या दुषित पाण्यामुळे वैनंगगा नदीचे दुषित पाणी, राष्ट्रिय महामार्गावरील जमीनीचे भूसंपादन, बायपास मार्ग, अवैध रेती वाहतूक व सुलभ रेती वाहतूक, घरकुल, पर्यटन धोरण, महसूल, ग्रामविकास तसेच ग्रामस्तरावरील रिक्त पदे, वैनगंगा नदीत जलपर्णी वनस्पतीमुळे होणाºया परिणामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी