शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

अक्षय तृतीयाच्या कळशीला बसतोय कोरोना संसर्गाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST

मुखरु बागडे पालांदूर : स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. ...

मुखरु बागडे

पालांदूर : स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अशा या अक्षय तृतीयेला पितर भोजनासाठी मातीची लाल कळशी महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी कुंभार गल्लीत या कळशांची निर्मिती होते. यंदाही शेकडो कळशा कुंभार गल्लीत तयार आहेत. मात्र, कोरोना संसर्गामुळे बाहेर विकायला न्यायच्या कशा, असा प्रश्न कुंभार गल्लीला पडला आहे. शुक्रवारी अक्षय तृतीया असली तरी अद्यापही कळशा मात्र कुंभारांच्या घरीच आहेत.

पूर्व विदर्भात अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना भोजनदान केले जाते. त्यासाठी लाल रंगाची कळशी महत्त्वाची मानली जाते. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासोबतच त्यांना भोजन दिले जाते. या सणाला लाल कळशीला महत्त्व असल्याने प्रत्येक गावातील कुंभार गल्लीत अशा कळशांची निर्मिती सुरू होते. अक्षय तृतीया काही दिवस असली की शहरात विविध ठिकाणी कळशांची रास रचून त्याची विक्री सुरू होते. अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी तर मोठी गर्दी होते. परंतु, यंदा कोरोना संसर्गाने सर्व गणितच बिघडले. पालांदूर येथील उदाराम ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आता घरी कळशा तयार करून आहेत. परंतु, त्या बाजारापर्यंत न्यायच्या कशा, असा प्रश्न आहे. तुलाराम ठाकरे, शामराव पाथरे यांनीही आपली व्यथा मांडली. कळशा विकल्याच नाही तर आम्ही कसे दिवस काढणार, असा प्रश्न त्यांनी केला. एकंदरीत अक्षय तृतीया आली तरी कुंभार गल्ली शांत आहे.

संचारबंदीने कुंभार व्यवसायाचे चाक थांबले

गत वर्षभरापासून कोरोना संसर्ग सुरू आहे. सर्वच घटकांना याचा फटका बसत आहे. गावागावांत असलेल्या कुंभार व्यवसायालाही कोरोनाचा फटका सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माठांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी गल्लोगल्लीत माठांची विक्री सुरू असते. त्यासोबतच अक्षय तृतीयेला लागणाऱ्या लाल कळशांची निर्मितीही केली जाते. यावर्षी कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. मात्र, अनेकांनी मोठ्या आशेने लाल कळशा तयार केल्या. कितीही मोठे संकट असले तरी अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना भोजनदान करावेच लागणार हे माहीत आहे. त्यामुळेच लाल कळशा तयार आहेत. परंतु आता त्या संचारबंदीने शहरापर्यंत न्यायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आता कुंभार गल्ली गाठून कळशा विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणात कुंभार व्यवसाय आहे आणि तेथेच या कळशांची निर्मिती होते. परंतु आता तयार केलेल्या संपूर्ण कळशा विकल्या जातील काय? अशी चिंता पालांदूर येथील रेखाबाई पाथरे यांना लागली आहे. अक्षय तृतीयेला कळशा विकल्या गेल्या तरच आमचे काही खरे आहे, असे त्या म्हणाल्या. अशीच अवस्था इतरही समाजबांधवांची आहे.