शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

अक्षय तृतीयाच्या कळशीला बसतोय कोरोना संसर्गाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST

मुखरु बागडे पालांदूर : स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. ...

मुखरु बागडे

पालांदूर : स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अशा या अक्षय तृतीयेला पितर भोजनासाठी मातीची लाल कळशी महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी कुंभार गल्लीत या कळशांची निर्मिती होते. यंदाही शेकडो कळशा कुंभार गल्लीत तयार आहेत. मात्र, कोरोना संसर्गामुळे बाहेर विकायला न्यायच्या कशा, असा प्रश्न कुंभार गल्लीला पडला आहे. शुक्रवारी अक्षय तृतीया असली तरी अद्यापही कळशा मात्र कुंभारांच्या घरीच आहेत.

पूर्व विदर्भात अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना भोजनदान केले जाते. त्यासाठी लाल रंगाची कळशी महत्त्वाची मानली जाते. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासोबतच त्यांना भोजन दिले जाते. या सणाला लाल कळशीला महत्त्व असल्याने प्रत्येक गावातील कुंभार गल्लीत अशा कळशांची निर्मिती सुरू होते. अक्षय तृतीया काही दिवस असली की शहरात विविध ठिकाणी कळशांची रास रचून त्याची विक्री सुरू होते. अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी तर मोठी गर्दी होते. परंतु, यंदा कोरोना संसर्गाने सर्व गणितच बिघडले. पालांदूर येथील उदाराम ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आता घरी कळशा तयार करून आहेत. परंतु, त्या बाजारापर्यंत न्यायच्या कशा, असा प्रश्न आहे. तुलाराम ठाकरे, शामराव पाथरे यांनीही आपली व्यथा मांडली. कळशा विकल्याच नाही तर आम्ही कसे दिवस काढणार, असा प्रश्न त्यांनी केला. एकंदरीत अक्षय तृतीया आली तरी कुंभार गल्ली शांत आहे.

संचारबंदीने कुंभार व्यवसायाचे चाक थांबले

गत वर्षभरापासून कोरोना संसर्ग सुरू आहे. सर्वच घटकांना याचा फटका बसत आहे. गावागावांत असलेल्या कुंभार व्यवसायालाही कोरोनाचा फटका सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माठांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी गल्लोगल्लीत माठांची विक्री सुरू असते. त्यासोबतच अक्षय तृतीयेला लागणाऱ्या लाल कळशांची निर्मितीही केली जाते. यावर्षी कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. मात्र, अनेकांनी मोठ्या आशेने लाल कळशा तयार केल्या. कितीही मोठे संकट असले तरी अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना भोजनदान करावेच लागणार हे माहीत आहे. त्यामुळेच लाल कळशा तयार आहेत. परंतु आता त्या संचारबंदीने शहरापर्यंत न्यायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आता कुंभार गल्ली गाठून कळशा विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणात कुंभार व्यवसाय आहे आणि तेथेच या कळशांची निर्मिती होते. परंतु आता तयार केलेल्या संपूर्ण कळशा विकल्या जातील काय? अशी चिंता पालांदूर येथील रेखाबाई पाथरे यांना लागली आहे. अक्षय तृतीयेला कळशा विकल्या गेल्या तरच आमचे काही खरे आहे, असे त्या म्हणाल्या. अशीच अवस्था इतरही समाजबांधवांची आहे.