शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

अक्षय तृतीयाच्या कळशीला बसतोय कोरोना संसर्गाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST

मुखरु बागडे पालांदूर : स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. ...

मुखरु बागडे

पालांदूर : स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अशा या अक्षय तृतीयेला पितर भोजनासाठी मातीची लाल कळशी महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी कुंभार गल्लीत या कळशांची निर्मिती होते. यंदाही शेकडो कळशा कुंभार गल्लीत तयार आहेत. मात्र, कोरोना संसर्गामुळे बाहेर विकायला न्यायच्या कशा, असा प्रश्न कुंभार गल्लीला पडला आहे. शुक्रवारी अक्षय तृतीया असली तरी अद्यापही कळशा मात्र कुंभारांच्या घरीच आहेत.

पूर्व विदर्भात अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना भोजनदान केले जाते. त्यासाठी लाल रंगाची कळशी महत्त्वाची मानली जाते. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासोबतच त्यांना भोजन दिले जाते. या सणाला लाल कळशीला महत्त्व असल्याने प्रत्येक गावातील कुंभार गल्लीत अशा कळशांची निर्मिती सुरू होते. अक्षय तृतीया काही दिवस असली की शहरात विविध ठिकाणी कळशांची रास रचून त्याची विक्री सुरू होते. अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी तर मोठी गर्दी होते. परंतु, यंदा कोरोना संसर्गाने सर्व गणितच बिघडले. पालांदूर येथील उदाराम ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आता घरी कळशा तयार करून आहेत. परंतु, त्या बाजारापर्यंत न्यायच्या कशा, असा प्रश्न आहे. तुलाराम ठाकरे, शामराव पाथरे यांनीही आपली व्यथा मांडली. कळशा विकल्याच नाही तर आम्ही कसे दिवस काढणार, असा प्रश्न त्यांनी केला. एकंदरीत अक्षय तृतीया आली तरी कुंभार गल्ली शांत आहे.

संचारबंदीने कुंभार व्यवसायाचे चाक थांबले

गत वर्षभरापासून कोरोना संसर्ग सुरू आहे. सर्वच घटकांना याचा फटका बसत आहे. गावागावांत असलेल्या कुंभार व्यवसायालाही कोरोनाचा फटका सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माठांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी गल्लोगल्लीत माठांची विक्री सुरू असते. त्यासोबतच अक्षय तृतीयेला लागणाऱ्या लाल कळशांची निर्मितीही केली जाते. यावर्षी कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. मात्र, अनेकांनी मोठ्या आशेने लाल कळशा तयार केल्या. कितीही मोठे संकट असले तरी अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना भोजनदान करावेच लागणार हे माहीत आहे. त्यामुळेच लाल कळशा तयार आहेत. परंतु आता त्या संचारबंदीने शहरापर्यंत न्यायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आता कुंभार गल्ली गाठून कळशा विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणात कुंभार व्यवसाय आहे आणि तेथेच या कळशांची निर्मिती होते. परंतु आता तयार केलेल्या संपूर्ण कळशा विकल्या जातील काय? अशी चिंता पालांदूर येथील रेखाबाई पाथरे यांना लागली आहे. अक्षय तृतीयेला कळशा विकल्या गेल्या तरच आमचे काही खरे आहे, असे त्या म्हणाल्या. अशीच अवस्था इतरही समाजबांधवांची आहे.