शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत बँकांना तीन सलग सुट्ट्यांनी व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 21:43 IST

दिवाळीचा सण  उत्साही वातावरणात सगळीकडेच साजरा होत आहे. शहरात दररोजच खरेदीचा मुहूर्त असतो; मात्र ग्रामीण भागात वेळेवर येणाऱ्या पैशातून खरेदीचा मुहूर्त साधला जातो. कर्जमुक्ती प्रोत्साहन निधीची रक्कम गुरुवारी रात्रीपर्यंत जमा झाली. शुक्रवारी बँकेत तोबा गर्दी तयार झाली. रोखीचा सुद्धा तुटवडा भासला. त्यामुळे बऱ्याच खातेदारांना व शेतकरी लाभार्थ्यांना पैशाची उचल करता आली नाही.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दिवाळीच्या आनंदीमय  सोहळ्यात बँकांना सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने गोरगरिबांसह शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी, संजय गांधी निराधार,  श्रावण बाळ  योजनेचे लाभार्थी व्यवहारासाठी अडचणीत आले. तरुणाई मात्र ऑनलाईन व्यवहार करीत दिवाळीची खरेदी करीत आहे. सुशिक्षित एटीएममधून पैसे काढून दिवाळीचा आनंद साजरा करीत आहेत. सर्वसामान्यांचे व्यवहार ठप्प पडले आहेत.दिवाळीचा सण  उत्साही वातावरणात सगळीकडेच साजरा होत आहे. शहरात दररोजच खरेदीचा मुहूर्त असतो; मात्र ग्रामीण भागात वेळेवर येणाऱ्या पैशातून खरेदीचा मुहूर्त साधला जातो. कर्जमुक्ती प्रोत्साहन निधीची रक्कम गुरुवारी रात्रीपर्यंत जमा झाली. शुक्रवारी बँकेत तोबा गर्दी तयार झाली. रोखीचा सुद्धा तुटवडा भासला. त्यामुळे बऱ्याच खातेदारांना व शेतकरी लाभार्थ्यांना पैशाची उचल करता आली नाही.संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर ऑनलाईन पद्धतीने खात्यात जमा झाले, असे तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत माहिती झाली नाही. त्यामुळे पुढच्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांनी गोरगरिबांची दिवाळी निराशेचीच ठरली. शासनाने व प्रशासनाने बँकिंग सुट्ट्यांचा अंदाज घेऊन पाच दिवसांपूर्वी आर्थिक नियोजन व्यवस्थित केले असते तर निश्चितच सर्वांची दिवाळी गोड झाली असती. मात्र आता वेळेवर खात्यात पैसे जमा झाल्याने धावपळ करावी लागत आहे.

मंगळवारी होणार तुफान गर्दी - २२ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार त्यामुळे बंद, २३ ऑक्टोंबरला रविवार नियोजित सुट्टी व सोमवारला लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी आली. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद आहेत. तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर २५ ऑक्टोबर बँक उघडणार. त्यामुळे बँकेत ग्राहकांची एकच गर्दी होणार आहे. शिक्षकांचे पगार, निराधारांचे मानधन, शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी व नियमितचे व्यवहारासाठी ग्राहकांची एकच झुंबड राहणार आहे.

रोखीची समस्या राहणार?एकाचवेळी खातेदारांना निधीची व्यवस्था करताना बँकांना जिकिरीचे होणार असल्याची शक्यता दाट आहे. एटीएमवर ग्राहकांची गर्दी वाढलेली आहे. तर काही व्यवहार एकमेकांकडून तात्पुरत्या स्वरूपात उसनवार घेत तात्पुरती गरज भागवली जात आहे.

 

टॅग्स :bankबँक