शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

कृषी अधिकाऱ्यांचे ‘लेखणी बंद’

By admin | Updated: October 4, 2016 00:29 IST

जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत कार्यरत कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.

कामकाजावर परिणाम : राजपत्रित अधिकारीपदाच्या दर्जाची मागणीभंडारा : जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत कार्यरत कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. यासोबतच त्यांना राजपत्रित अधिकारी पदाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी या अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कृषी विभागात विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सोयी-सुविधा देण्यात याव्या या मागणीसाठी सदर अधिकाऱ्यांनी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागण्यांना केवळ आश्वासन देवून त्यांचे आंदोलन वेळोवेळी बंद करण्यात आले. शासनाच्या विकासोपयोगी योजनांची अंमलबजावणी करून त्याचा लाभ ग्रामीण तथा शहरी भागातील नागरिकांना देण्यासाठी कृषी विभागातील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) हे कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील २६ कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी आज जिल्हा परिषद प्रांगणात कामबंद आंदोलन केले. आजच्या कामबंद आंदोलनासोबतच उद्यापासून समस्या निकाली निघेपर्यंत बेमुदत लेखणी बंद आंदोलनही पुकारले आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या या आंदोलनामुळे कृषी विभागाच्या कामावर परिणाम जाणवून आला. पहिल्या आंदोलनानंतर आता हे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू झाले असून शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागले आहे. सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पुकारण्यात आले आहे. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष माणिक जांभुळकर, सुरेंद्र झलके, रविंद्र तायडे यांनी केले. यावेळी रमेश झोडपे, अनिल शेंडे, शांतिलाल गायधने, प्रमोद वानखेडे, रविंद्र वंजारी, रोहिनी डोंगरे, विजयी माकोडे, बब्रुवाहन मेहर, गजानन निमजे, रंजू शहारे, ईस्लाम भांडारकर, संजय न्यायमुर्ती, भरत भोयर, भाग्यवान भोयर, संजय लांजेवार यांच्यासह सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी आंदोलनास्थळी भेट देवून अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. (शहर प्रतिनिधी)