शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कृषी अधिकाऱ्यांचे ‘लेखणी बंद’

By admin | Updated: October 4, 2016 00:29 IST

जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत कार्यरत कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.

कामकाजावर परिणाम : राजपत्रित अधिकारीपदाच्या दर्जाची मागणीभंडारा : जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत कार्यरत कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. यासोबतच त्यांना राजपत्रित अधिकारी पदाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी या अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कृषी विभागात विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सोयी-सुविधा देण्यात याव्या या मागणीसाठी सदर अधिकाऱ्यांनी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागण्यांना केवळ आश्वासन देवून त्यांचे आंदोलन वेळोवेळी बंद करण्यात आले. शासनाच्या विकासोपयोगी योजनांची अंमलबजावणी करून त्याचा लाभ ग्रामीण तथा शहरी भागातील नागरिकांना देण्यासाठी कृषी विभागातील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) हे कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील २६ कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी आज जिल्हा परिषद प्रांगणात कामबंद आंदोलन केले. आजच्या कामबंद आंदोलनासोबतच उद्यापासून समस्या निकाली निघेपर्यंत बेमुदत लेखणी बंद आंदोलनही पुकारले आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या या आंदोलनामुळे कृषी विभागाच्या कामावर परिणाम जाणवून आला. पहिल्या आंदोलनानंतर आता हे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू झाले असून शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागले आहे. सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पुकारण्यात आले आहे. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष माणिक जांभुळकर, सुरेंद्र झलके, रविंद्र तायडे यांनी केले. यावेळी रमेश झोडपे, अनिल शेंडे, शांतिलाल गायधने, प्रमोद वानखेडे, रविंद्र वंजारी, रोहिनी डोंगरे, विजयी माकोडे, बब्रुवाहन मेहर, गजानन निमजे, रंजू शहारे, ईस्लाम भांडारकर, संजय न्यायमुर्ती, भरत भोयर, भाग्यवान भोयर, संजय लांजेवार यांच्यासह सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी आंदोलनास्थळी भेट देवून अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. (शहर प्रतिनिधी)