शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

कृषी विभाग म्हणतो, आठ हजार हेक्टरवरच नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी प्राथमिक नजर अंदाज अहवाल शासनाला सादर केला.

ठळक मुद्देप्राथमिक अहवाल : परतीच्या पावसाचा जिल्हाभर फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीच्या पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले असले तरी कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतात पंचनाम्यासाठी कर्मचारीच पोहोचले नाही. तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे विम्याचा लाभ मिळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी प्राथमिक नजर अंदाज अहवाल शासनाला सादर केला. त्यात जिल्ह्यातील सात तालुक्यात आठ हजार ८० हेक्टर नुकसान झाल्याचे म्हटले आहे.प्रत्यक्षात जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असताना २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधित पावसामुळे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला. त्यात जिल्ह्यात बाधित गावांची संख्या ४५४ नमूद करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात एक लाख ९१ हजार २४१ हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी आठ हजार ८० हेक्टरचे नुकसान झाले असून ३३ टक्क्यांच्या आत १९८१ हेक्टर आणि ३३ टक्क्यांच वर ६०९९ हेक्टर असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.खरीपाचा सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत होते. नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. कमी कालावधीचा साधारण धान दिवाळीपुर्वी कापणीला आला. शेतकऱ्यांनी कापणीतून पुंजणे तयार केले.कडपा वाळण्यासाठी साधारण आठ दिवसाचा कालावधी लागतो. याच सुमारास परतीचा पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. शेतात पाणी साचले.ढगाळ वातावरणामुळे कडपा ओल्या राहून त्याला अंकुर फुटले. पावसामुळे अनेक ठिकाणचे धान काळे पडले असून बाजारात त्याला कवडीची किंमत नाही.

टॅग्स :agricultureशेती