शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

कृषी विभागाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 29, 2015 00:50 IST

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बळीराजा अडचणीत : मार्गदर्शनाची गरजकोंढा (कोसरा) : विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मृद परीक्षण करण्याचे आवाहन करीत असताना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांनी कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे याची शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून माहिती मिळणे दुरापास्त झाले आहे.पवनी तालुक्यातील शेतकरी योग्य उत्पादन घेऊ शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे कर्जाचे डोंगर वाढत चालले आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे एक मुख्य कारण आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत. शिवाय जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहेत. या ठिकाणीही माती परीक्षण करण्याची सोय करून देण्यात आली आहे. पण माती परीक्षण करण्याची सोय गाव व तालुकास्थळी नसल्याने अडचण जात आहे. माती परीक्षण करून पीक लागवड करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञ देत असतात. पण माती परीक्षण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहाय्य करीत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे. माती परीक्षण करावे लागते याचे ज्ञानच शेतकऱ्यांना माहीत नाही. सध्या शेतकरी रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामध्ये युरीया खताचा चौरास भागात सर्वात जास्त खत म्हणून वापर केल्याचे दिसून येते. युरिया खतामुळे खान पिकाची काडी वाढून येते व कंबरेमध्ये मोडते. तसेच युरियाच्या जास्त उपयोगामुळे मानवी शरीरावर जास्त परिणाम होत असते. अशावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळताना दिसत नाही. तालुका कृषी कार्यालय व मंडळ कार्यालये हे फक्त कागदी घोडे रंगविण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. सध्या धान शेती व इतर खरीप हंगाम चौरास भागात शेतकरी करीत आहे. कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. (वर्ताहर)