शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 29, 2015 00:50 IST

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बळीराजा अडचणीत : मार्गदर्शनाची गरजकोंढा (कोसरा) : विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मृद परीक्षण करण्याचे आवाहन करीत असताना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांनी कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे याची शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून माहिती मिळणे दुरापास्त झाले आहे.पवनी तालुक्यातील शेतकरी योग्य उत्पादन घेऊ शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे कर्जाचे डोंगर वाढत चालले आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे एक मुख्य कारण आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत. शिवाय जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहेत. या ठिकाणीही माती परीक्षण करण्याची सोय करून देण्यात आली आहे. पण माती परीक्षण करण्याची सोय गाव व तालुकास्थळी नसल्याने अडचण जात आहे. माती परीक्षण करून पीक लागवड करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञ देत असतात. पण माती परीक्षण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहाय्य करीत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे. माती परीक्षण करावे लागते याचे ज्ञानच शेतकऱ्यांना माहीत नाही. सध्या शेतकरी रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामध्ये युरीया खताचा चौरास भागात सर्वात जास्त खत म्हणून वापर केल्याचे दिसून येते. युरिया खतामुळे खान पिकाची काडी वाढून येते व कंबरेमध्ये मोडते. तसेच युरियाच्या जास्त उपयोगामुळे मानवी शरीरावर जास्त परिणाम होत असते. अशावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळताना दिसत नाही. तालुका कृषी कार्यालय व मंडळ कार्यालये हे फक्त कागदी घोडे रंगविण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. सध्या धान शेती व इतर खरीप हंगाम चौरास भागात शेतकरी करीत आहे. कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. (वर्ताहर)