शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

कृषी विभागाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 29, 2015 00:50 IST

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बळीराजा अडचणीत : मार्गदर्शनाची गरजकोंढा (कोसरा) : विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मृद परीक्षण करण्याचे आवाहन करीत असताना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांनी कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे याची शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून माहिती मिळणे दुरापास्त झाले आहे.पवनी तालुक्यातील शेतकरी योग्य उत्पादन घेऊ शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे कर्जाचे डोंगर वाढत चालले आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे एक मुख्य कारण आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत. शिवाय जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहेत. या ठिकाणीही माती परीक्षण करण्याची सोय करून देण्यात आली आहे. पण माती परीक्षण करण्याची सोय गाव व तालुकास्थळी नसल्याने अडचण जात आहे. माती परीक्षण करून पीक लागवड करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञ देत असतात. पण माती परीक्षण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहाय्य करीत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे. माती परीक्षण करावे लागते याचे ज्ञानच शेतकऱ्यांना माहीत नाही. सध्या शेतकरी रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामध्ये युरीया खताचा चौरास भागात सर्वात जास्त खत म्हणून वापर केल्याचे दिसून येते. युरिया खतामुळे खान पिकाची काडी वाढून येते व कंबरेमध्ये मोडते. तसेच युरियाच्या जास्त उपयोगामुळे मानवी शरीरावर जास्त परिणाम होत असते. अशावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळताना दिसत नाही. तालुका कृषी कार्यालय व मंडळ कार्यालये हे फक्त कागदी घोडे रंगविण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. सध्या धान शेती व इतर खरीप हंगाम चौरास भागात शेतकरी करीत आहे. कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. (वर्ताहर)