शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

कारखाना परिसरातील शेतजमीन निकामी

By admin | Updated: January 17, 2017 00:22 IST

एमआयडीसी राजेगाव (गडेगाव) येथे असलेल्या वरम बायो एनर्जी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी व धूळ प्रदुषणाचे कण शेतामध्ये शिरत असल्याने शेतजमीन निकामी झालेली आहे.

शेतकरी संकटात : प्रकरण वरमबायो एनर्जी कारखान्याचेभंडारा : एमआयडीसी राजेगाव (गडेगाव) येथे असलेल्या वरम बायो एनर्जी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी व धूळ प्रदुषणाचे कण शेतामध्ये शिरत असल्याने शेतजमीन निकामी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून न्याय मिळावा, यासाठी शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे धावाधाव घेत आहे. वरम बायो एनर्जी कारखान्यालगत राजेगाववासीयांची शेकडो एकर शेती आहे. हा कारखाना २००८ पासून सुरु करण्यात आला. येथून केमीकलयुक्त सांडपाणी व धुळीचे कण शेतकऱ्यांच्या शेतात येत आहे. त्यामुळे २००८ मध्ये शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळ व जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आली. तेव्हा कारखाना व्यवस्थापनाने सांडपाणी येणे बंद केले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कारखान्यातील धूळ प्रदूषण व सांडपाणी शेतात येत आहे. राजेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती कारखान्यालगत असून या शेतीच्या माध्यमातून ते उदरनिर्वाह करीत होते. पावसाळ्यात धानाचे पिक घेतले जाते. त्यानंतर रब्बी पिक, हरभरा, गहू, पोपट, उडीद, मुग आदी पिके घेतली जातात. परंतु कारखाना आरंभ झाला तेव्हापासून प्रदूषणामुळे पिके नष्ट होत आहेत. कर्ज काढून दरवर्षी शेती कसली जात आहे. कारखान्यातील पाण्यामुळे उत्पादन होत नाही. प्रदूषण व सांडपाण्यामुळे पिके जळत आहेत. दुषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कारखान्याच्या आवारात शोषखड्डा तयार केलेला नाही. हेतूपुरस्सर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दूषित पाण्याचा प्रवाह सुरु आहे. तक्रार करूनही अधिकारी व व्यवस्थापनाने मोका तपासणी केलेली नाही.असे सतत सुरु असले तर शेतजमिन निकामी होत आहे. जिल्हा प्रशासनाने व प्रदूषण मंडळाने कारखाना व्यवस्थापनाला सांडपाण्याची विल्हेवाट लावून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी सन २००९ मध्ये प्रदूषण मंडळाचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी अहवाल तयार केला होता. त्यानंतरही कारखान्याने सांडपाणी शेतीमध्ये जाणे बंद केले नाही. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी कायमचा उपाय शोधावा. नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राजेगाव परीसरातील नागरिकांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)प्रदूषणामुळे धोकावरम बायो कारखान्यात धानाच्या कोंड्यापासून विज निर्मिती करण्यात येते. यामुळे धूर प्रदूषण वाढले आहे. कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाली आहे. कारखान्यातील धूर कांडीतून (चिमनी) मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे परिसरात आवागमन करणाऱ्या अनेकांना डोळ्यांचा आजार बळावला आहे. याकडे प्रदुषण विभागाने लक्ष द्यावे.