शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पुन्हा दोन व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

भंडारा येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये शुक्रवारपर्यंत ४१ व्यक्ती भरती असून आतापर्यंत २९० व्यक्तींना या वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग, होस्टेल भंडारा क्वारंटाईनमध्ये २१ व्यक्ती भरती आहेत. साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २४५ व्यक्ती असे एकूण २६६ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत १११७ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांची संख्या २६ : जिल्हा प्रशासन जोमाने लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गुरूवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्यात दोन रुग्णांची भर पडली. एकंदरीत जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २६ झाली आहे. गत तीन दिवसात आठ रुग्णांची वाढ झाली आहे.जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील एक तर पवनी तालुक्यातील एक असे दोघांचे नमुने शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. गत दोन आठवड्यापासून जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दृश्य आहे. विशेष म्हणजे बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांपैकीच कोरोना रुग्ण आढळून येत आहे.भंडारा येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये शुक्रवारपर्यंत ४१ व्यक्ती भरती असून आतापर्यंत २९० व्यक्तींना या वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग, होस्टेल भंडारा क्वारंटाईनमध्ये २१ व्यक्ती भरती आहेत.साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २४५ व्यक्ती असे एकूण २६६ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत १११७ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र येथे फ्ल्यु ओपीडी सुरू करण्यात आली असून त्यामध्ये श्वासदाहाचे एकूण १४४ व्यक्ती भरती आहे. यासर्वही व्यक्तींचे घशातील नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १४२ नमूने निगेटिव्ह आहे. एक अहवाल अजुनही अप्राप्त आहे. जिल्ह्याच्या सीमावर नऊ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून या पोस्टवर वैद्यकीय पथकही नेमण्यात आले आहे.गावपातळीवर घरोघरी आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत तीव्र श्वासदाहक रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून कोरोनासंदर्भात लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ९१ हजार ४९३ नागरिकांनी आरोग्य सेतू हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. त्याचा लाभही नागरिक घेत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले.जिल्ह्यात आले ३८ हजार ९७२ व्यक्तीपुणे, मुंबई व इतर राज्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार ९७२ व्यक्ती आले आहेत. यापैकी २६ हजार ३८३ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच पुणे, मुंबई व इतर राज्यातून आलेल्यांपैकी १२ हजार ५८९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांना घरा बाहेर निघू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे.गुरूवारी ९९ व्यक्तींच्या घश्यातील नमूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले होते. आतापर्यंत नागपूर येथे १६५२ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १४६२ नमूने निगेटिव्ह आले आहे. २६ जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहे. आतापर्यंत पाठविलेल्या एकूण नमुन्यांपैकी १६४ जणांचे अहवाल अप्राप्त आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या