शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

१२ वर्षानंतर पाथरीत नळाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:21 IST

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ) : तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंदच्या तिरावरील पाथरी एक छोटेखानी गाव. घराघरात पशुपालन, कुकुटपालन चालते. पण या सर्वांना पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही समस्या मिटली ...

ठळक मुद्देवैयक्तिक व सार्वजनिक नळातून पाणी : ऐन उन्हाळ्यात नळाला पाणी

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ) : तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंदच्या तिरावरील पाथरी एक छोटेखानी गाव. घराघरात पशुपालन, कुकुटपालन चालते. पण या सर्वांना पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही समस्या मिटली आहे.गावात यापूर्वी नळयोजना असूनही स्त्रोत अभावाने गावाला पिण्याचे पाणी मिळत नव्हते. नदीकाठावर राहूनही पाण्याकरिता शेताचा, नदीचा आसरा घेत पाण्याची गरज भागविल्या जात असे, राजकारणात खूप मोठी झेप गावकºयांची नसल्याने प्रशासनाचा भरोवश्यावर पाथरीचा विकास अवलंबून होता व आहे. मात्र यातही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी असतातच. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाथरी गावाला जोडत सदर नळयोजनेचा कार्यालयाला आरंभ झाला.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोरेश्वर मैदनमवार, उपविभागीय अभियंता विजय देशमुख, भूवैद्यानिक सय्यद, मंगुळकर तसेच विशाल मंत्री यांच्या योग मार्गदर्शनानुसार कामे करीत गावात नळयोजना भरपूर पाण्यासह कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजने संदर्भात गावकºयांनी सहकार्य करीत पाण्याची अडचण दूर केली.पाणी हे जीवन असून अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येकांनी काटकसरीने उपयोग करावा. ग्रामपंचायतीने स्वत:च्या निधीतून जलमापन (वाटरमिटर) यंत्र खरेदी करावे. घराघरात नळ घेत नागरिकांनी ग्रामपंचायतीला मदत करावी. जलमापन यंत्राणे पाण्याची गरज व महत्व अबादीत राहते. यामुळे गावात २४ तास पाणी पुरेल याची काळजी आम्ही घेऊ.- सतीश मारबते, शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग भंडारागावात नळयोजना आरंभल्याने गाववाशींयाना अपार आनंद झाला. गावकºयांनीही वैयक्तिक नळकरीता मागणी केली आहे. मागेल त्याला नळ ही योजना कार्यान्वित करीत गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न करु.- तुळशीदास फुंडे, सरपंच पाथरीअधिकारी वर्गांनी वेळोवेळी आलेल्या अडचणीचा मागोवा घेत सुरळीत नळयोजना कार्यान्वित ठेवावी. जल साक्षरता कार्यक्रमातून आम्हाला मार्गदर्शन करावे.- जितेंद्र कठाणे, उपसरपंच पाथरी