शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

खरिपानंतर आता रबी पिकांवरही अस्मानी संकट

By admin | Updated: December 12, 2015 00:34 IST

खरिपाच्या धान पिकाने नुकसान झाले. पर्णकोष व तुडतुड्याने हाताशी आलेले पीक गेल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही.

मूग, उडी, हळद पिकांवर भर : मंडळ कृषी कार्यालय शेतावरपालांदूर : खरिपाच्या धान पिकाने नुकसान झाले. पर्णकोष व तुडतुड्याने हाताशी आलेले पीक गेल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. रबीत तरी काही विशेष करुन उत्पन्न वाढविण्याच्या आशेने शर्थीचे प्रयत्नही किडीने धुळीस मिळविले. तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने बागायत पिकाला धोका वाढल्याने किड लागण्याची शक्यता बळावली आहे. पालांदूर मंडळात रबी हंगामातील पेरणी क्षेत्र २,९१७.९० हेक्टर असून गहू १८४७.७० हेक्टर, हरभरा २६१.५० हेक्टर, मूग २४९.५० हेक्टर, उडीद ३३५ हेक्टरवर पेरणी केली आहे. मंडळ कृषी विभाग पालांदूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून सभा घेत आहेत. बांधावर मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके म्हणाले, पेरणीपूर्व बीजप्रक्रिया बियाणाला चोळून पेरणी करावी. मरणासन्न झाडे उपडून नष्ट करावे. पाने खाणाऱ्या अळींसाठी फवारणी करावी. रस शोषण करणाऱ्या किडींमुळे पाने पिवळी पडलेली आढळल्यास फवारणी करावी. हरभऱ्याची एक महिन्याची वाढ झाल्यास शेंडे खुडावे, जेणेकरुन वाढ जोमात होण्यास मदत होईल. मऱ्हेगाव ढिवरखेडा, पाथरी, खराशी, खुनारी, कनेरी, नरव्हा, लोहारा, पालांदूर आदी गावात सभा घेऊन पिक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायती शेतीला फटका बसत असून पाने खाणारी अळी जोरदार आक्रमण करीत आहे. भेंडीपिकाला बारीक पाखरे वेढली आहेत. पालांदूर परिसरात बागायतीचे क्षेत्रफळ वाढत आहे. ढगाळ वातावरणाने मेथी भाजी वाया जात आहे. (वार्ताहर)