शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही वीटपुरात सुविधांची वाणवा

By admin | Updated: March 3, 2017 00:42 IST

शासन आपल्या दारी असा उल्लेख केला जातो, पंरतु तुमसर तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी विटपुर गावात ...

शंभर टक्के आदिवासी गावाची व्यथा : शौचालयाचा अभाव, रस्ता, पिण्याचे पाणी, जमिनीची मालकी नाहीमोहन भोयर  तुमसर शासन आपल्या दारी असा उल्लेख केला जातो, पंरतु तुमसर तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी विटपुर गावात शासन चक्क गावातच पोहोचले नाही. गावाला जाण्याकरिता रस्ता नाही. ४०० लोकवस्तीच्या गावात १५ ते २० घरात केवळ शौचालय आहे. रोजगार हमीची कामे गावात झालीच नाही. शेतीला सरंक्षण नाही. गावात एस.टी. जात नाही. चवथ्या वर्गानंतर शाळा नसल्याने पुढचे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. आदिवासी बांधवांची स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही उपेक्षा सुरुच आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत व तुमसर तालुक्याचे शेवटच्या टोकावर घनदाट जंगलात विटपूर हे आदिवासी गाव आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर शासन व प्रशासनाच्या उदानिसतेमुळे पायाभुत सोयी सुविधेपासून कायम वंचित आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीवर या गावाने बहिष्कार घातला होता. तेव्हा हे गाव चर्चेत आले होते. पुढे गावाला अधिकारी व लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. पंरतु त्यानंतर काहीच बदल घडला नाही.आलेसुर, विटपुर, खापा, सितेकसा व विटपूर अशी गटग्रामपंचायत आहे. विटपूरची लोकसंख्या सुमारे ४०० इतकी आहे. ५५ ते ६० घरे आहेत. येथे १५ ते २० घरी केवळ शौचालय आहेत. उर्वरीत घरी शौचालयाच्या अर्ध्या भिंती बांधून तयार आहेत. नंतर बांधकाम झालेले नाही. गावात जिल्हा परिषदेची १ ते ४ अशी शाळा आहे. तिथे १५ विद्यार्थी आहेत. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती व मजूरी आहे. १२ ते १५ वर्षापासून येथे रोजगार हमीची कामे झाली नाहीत. गावातून त्यामूळे पलायन सुरु आहे.विटपुर- आलेसुर असा रस्ता नाही. आलेसुर-विटपूर गट ग्रामपंचायत आहे. आलेसुर, चिखली, देवनारा, आसलपाणी या गावांना जोडणारा रस्ता नाही. लेंडेझरी- विटपुर असा सहा. किमीचा रस्ता केवळ दगडमय झाला आहे. मुरुम वाहून गेल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मानव विकास उपक्रमांतर्गत बससेवा येथे सुरु झाली होती. पंरतु खड्डेमय असल्याने बससेवा तात्काळ बंद करण्यात आली. त्यामुळे उच्च शिक्षणापासून येथे विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.पिण्याच्या पाण्यात लोहयुक्त क्षाराचे प्रमाण जास्त आहे. संयत्र येथे बसविण्यात आले. परंतु त्यात तांत्रिक बिघाडामुळे सध्या ते बंद आहे. शेतीला पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेला गाव तलावात अनेक वर्षापासून गाळ जमा आहे. त्यामुळे तलाव मैदानात रुपांतर झाले आहे. रोहयो कामांचे अहवाल सादर केल्यावरही कामांना मंजरी मिळाली नाही. गावाला रस्ता नसल्याने विवाहास येथे अडचणी निर्माण झाल्या आहेत.शेतीचे वर्ग दोन मध्ये वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे संरक्षण नाही. नियमानुसार ही शेती सरकारची मानली जाते. बावनथडी प्रकल्पात शेती गेली त्यांना यामुळे मोबदला मिळाला नाही. महसूल व वनविभाग एकमेकांकडे बोट दाखवित आहे. जिल्हाच्या नकाशात विटपूरचा नाव नाही. रोंघा या गावाला आमदार अनिल सोले यांनी दत्तक घेतले. त्यापेक्षा शंभर टक्के आदिवासी गावाला दत्तक घेण्याची येथे गरज होती. खासदाराच्या जनता दरबारात गावातील समस्यांचे निवेदन विविध विभागाला देण्यात आले. येत्या १५ दिवसात समस्या बाबत निर्णय न घेतल्यास ग्रामस्थ आदिवासी आंदोलन पुकारण्याच्या स्थितीत आहेत. ग्रामपंचायत सदस्य शोभा मसराम, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल उईके, रमेश धुर्वे यांनी याबाबत शासन प्रशानाला निवेदन सादर केले आहे.