शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीप्रदर्शनानंतर थंडावला प्रचार

By admin | Updated: July 3, 2015 00:50 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे.

रणधुमाळी जि.प. निवडणुकीची : मतदानासाठी केवळ २४ तासांचा अवधी शिल्लक भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारला कुठे पथनाट्य तर कुठे रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवार मतदारांच्या घरोघरी जावून मतांचा जोगवा मागताना दिसून आले. निवडणुकीसाठी अवघ्या २४ तासांचा अवधी शिल्लक आहे. शुक्रवार, शनिवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे.जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१० तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ५३३ असे एकूण ८४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या उमेदवारांनी जिल्ह्यातील शहरी भाग वगळून सुमारे आठशे गावे पालथी घातली आहेत. शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे मजूर शेतात व्यस्त असल्यामुळे या निवडणुकीत मतदारांमध्ये कमालिचा निरुत्साह दिसून आला. राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील नेत्यांची जाहिर सभा यासह क्षेत्राचा विकासनामा सादर करुन मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.दरम्यान, गुरुवारला प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला होता. अपक्ष उमेदवारांनी आपआपल्या तऱ्हेने बिल्ले, हँडबिल वाटप करुन मते मागितली. काही ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यानंतर मतदारांच्या घरोघरी जाऊन मते मागण्यासाठी घोडदौड सुरू झाली. मतदानासाठी २४ तासांचा अवधी शिल्लक आहे. हा अत्यंत महत्वाचा कालावधी असून याच कालावधीत जे काही शक्य आहे, ते केले जाणार आहे. उद्या शनिवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) दोन दिवस राहणार तळीरामांचा घसा कोरडा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी दि. ३ जुलैपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्व देशी व विदेशी दारु दुकान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यातून मार्ग काढण्याकरिता तळीरामांनी आधीच दारूचा स्टॉक करुन ठेवला आहे. मागील आठ दिवसात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात दारुची विक्री झाली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनातजिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ज्आिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात २५ पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १,२५० पोलीस कर्मचारी व ४०० गृहरक्षकांचा समावेश राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी यापुर्वीच जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी पोलिसांचा पहारा देत आहेत.