शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

शक्तीप्रदर्शनानंतर थंडावला प्रचार

By admin | Updated: July 3, 2015 00:50 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे.

रणधुमाळी जि.प. निवडणुकीची : मतदानासाठी केवळ २४ तासांचा अवधी शिल्लक भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारला कुठे पथनाट्य तर कुठे रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवार मतदारांच्या घरोघरी जावून मतांचा जोगवा मागताना दिसून आले. निवडणुकीसाठी अवघ्या २४ तासांचा अवधी शिल्लक आहे. शुक्रवार, शनिवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे.जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१० तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ५३३ असे एकूण ८४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या उमेदवारांनी जिल्ह्यातील शहरी भाग वगळून सुमारे आठशे गावे पालथी घातली आहेत. शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे मजूर शेतात व्यस्त असल्यामुळे या निवडणुकीत मतदारांमध्ये कमालिचा निरुत्साह दिसून आला. राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील नेत्यांची जाहिर सभा यासह क्षेत्राचा विकासनामा सादर करुन मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.दरम्यान, गुरुवारला प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला होता. अपक्ष उमेदवारांनी आपआपल्या तऱ्हेने बिल्ले, हँडबिल वाटप करुन मते मागितली. काही ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यानंतर मतदारांच्या घरोघरी जाऊन मते मागण्यासाठी घोडदौड सुरू झाली. मतदानासाठी २४ तासांचा अवधी शिल्लक आहे. हा अत्यंत महत्वाचा कालावधी असून याच कालावधीत जे काही शक्य आहे, ते केले जाणार आहे. उद्या शनिवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) दोन दिवस राहणार तळीरामांचा घसा कोरडा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी दि. ३ जुलैपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्व देशी व विदेशी दारु दुकान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यातून मार्ग काढण्याकरिता तळीरामांनी आधीच दारूचा स्टॉक करुन ठेवला आहे. मागील आठ दिवसात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात दारुची विक्री झाली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनातजिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ज्आिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात २५ पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १,२५० पोलीस कर्मचारी व ४०० गृहरक्षकांचा समावेश राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी यापुर्वीच जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी पोलिसांचा पहारा देत आहेत.