शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

तरीही धान शेती तहानलेलेच : नियमित वीजपुरवठा करण्याची बळीराजाची मागणी .संतोष जाधवर भंडारा : निम्मा पावसाळा संपत आला तरीही ...

तरीही धान शेती तहानलेलेच : नियमित वीजपुरवठा करण्याची बळीराजाची मागणी .संतोष जाधवर

भंडारा : निम्मा पावसाळा संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. साेमवारी दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरीही अजूनही धान शेतीला जोरदार पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील ९० धान रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र रोवणी नंतर आता पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्याने धान शेती सुकत असलेली दिसून येते. अनेक ठिकाणी शेतशिवारात जमिनीला भेगा पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे विहीर, बोअरवेलमध्ये मुबलक पाणी आहे. मात्र वीजपुरवठा होत नसल्याने सिंचन करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. गतवर्षी आलेला महापूर, तुडतुडा रोगाने हल्ला चढवल्याने धानाचे उत्पादन हाती आले नव्हते. त्यामुळे या खरीप हंगामात तरी चांगले उत्पादन होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पीक कर्ज काढून धान रोवणी केली आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

कोट

माझ्याकडे विहीर, बोअरवेलची सोय आहे. मात्र लाईट उपलब्ध होत नसल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात २४ तास वीज उपलब्ध राहते. शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

तानाजी गायधने,

कृषिभूषण पुरस्कारप्राप्त, शेतकरी चिखली.

कोट

माझ्याकडे दोन बोअरवेल आहेत. पण लाईट राहत नसल्याने काहीच उपयोग होत नाही. अजूनही माझी एक एकर रोवणी रखडली आहे. बळीराजावर संकट कायम असल्याने शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करुन शासकीय मदत द्यावी.

संजय आकरे, खरबी नाका

कोट

मंगळवारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरीही सध्या धान पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचनाची सोय आहे. मात्र विजेअभावी शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेत कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सिंचन योजना तसेच आधुनिक पीक पद्धतीचे फायदे सांगून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

बॉक्स

भगवंता आमची अशी परीक्षा बघू नको ...

जिल्ह्यातील बळीराजा देवाला पावसासाठी साकडे घालत आहेत. काहीही होऊ दे पण पाऊस पडू दे, बळीराजाची अशी सत्व परीक्षा भगवंता पाहू नको. आमच्यावरच दुष्काळाचे संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडून चांगले उत्पन्न होऊ दे अशी प्रार्थना अनेक ठिकाणी मंदिरातून केली जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय राेवणी

तालुका क्षेत्र प्रत्यक्ष टक्केवारी

भंडारा १००

मोहाडी ७०

तुमसर ९४

पवनी १३७

साकोली ८३

लाखांदूर ९६

लाखनी ८७

एकूण ९४