शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

तरीही धान शेती तहानलेलेच : नियमित वीजपुरवठा करण्याची बळीराजाची मागणी .संतोष जाधवर भंडारा : निम्मा पावसाळा संपत आला तरीही ...

तरीही धान शेती तहानलेलेच : नियमित वीजपुरवठा करण्याची बळीराजाची मागणी .संतोष जाधवर

भंडारा : निम्मा पावसाळा संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. साेमवारी दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरीही अजूनही धान शेतीला जोरदार पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील ९० धान रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र रोवणी नंतर आता पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्याने धान शेती सुकत असलेली दिसून येते. अनेक ठिकाणी शेतशिवारात जमिनीला भेगा पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे विहीर, बोअरवेलमध्ये मुबलक पाणी आहे. मात्र वीजपुरवठा होत नसल्याने सिंचन करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. गतवर्षी आलेला महापूर, तुडतुडा रोगाने हल्ला चढवल्याने धानाचे उत्पादन हाती आले नव्हते. त्यामुळे या खरीप हंगामात तरी चांगले उत्पादन होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पीक कर्ज काढून धान रोवणी केली आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

कोट

माझ्याकडे विहीर, बोअरवेलची सोय आहे. मात्र लाईट उपलब्ध होत नसल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात २४ तास वीज उपलब्ध राहते. शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

तानाजी गायधने,

कृषिभूषण पुरस्कारप्राप्त, शेतकरी चिखली.

कोट

माझ्याकडे दोन बोअरवेल आहेत. पण लाईट राहत नसल्याने काहीच उपयोग होत नाही. अजूनही माझी एक एकर रोवणी रखडली आहे. बळीराजावर संकट कायम असल्याने शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करुन शासकीय मदत द्यावी.

संजय आकरे, खरबी नाका

कोट

मंगळवारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरीही सध्या धान पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचनाची सोय आहे. मात्र विजेअभावी शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेत कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सिंचन योजना तसेच आधुनिक पीक पद्धतीचे फायदे सांगून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

बॉक्स

भगवंता आमची अशी परीक्षा बघू नको ...

जिल्ह्यातील बळीराजा देवाला पावसासाठी साकडे घालत आहेत. काहीही होऊ दे पण पाऊस पडू दे, बळीराजाची अशी सत्व परीक्षा भगवंता पाहू नको. आमच्यावरच दुष्काळाचे संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडून चांगले उत्पन्न होऊ दे अशी प्रार्थना अनेक ठिकाणी मंदिरातून केली जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय राेवणी

तालुका क्षेत्र प्रत्यक्ष टक्केवारी

भंडारा १००

मोहाडी ७०

तुमसर ९४

पवनी १३७

साकोली ८३

लाखांदूर ९६

लाखनी ८७

एकूण ९४