शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

तरीही धान शेती तहानलेलेच : नियमित वीजपुरवठा करण्याची बळीराजाची मागणी .संतोष जाधवर भंडारा : निम्मा पावसाळा संपत आला तरीही ...

तरीही धान शेती तहानलेलेच : नियमित वीजपुरवठा करण्याची बळीराजाची मागणी .संतोष जाधवर

भंडारा : निम्मा पावसाळा संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. साेमवारी दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरीही अजूनही धान शेतीला जोरदार पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील ९० धान रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र रोवणी नंतर आता पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्याने धान शेती सुकत असलेली दिसून येते. अनेक ठिकाणी शेतशिवारात जमिनीला भेगा पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे विहीर, बोअरवेलमध्ये मुबलक पाणी आहे. मात्र वीजपुरवठा होत नसल्याने सिंचन करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. गतवर्षी आलेला महापूर, तुडतुडा रोगाने हल्ला चढवल्याने धानाचे उत्पादन हाती आले नव्हते. त्यामुळे या खरीप हंगामात तरी चांगले उत्पादन होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पीक कर्ज काढून धान रोवणी केली आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

कोट

माझ्याकडे विहीर, बोअरवेलची सोय आहे. मात्र लाईट उपलब्ध होत नसल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात २४ तास वीज उपलब्ध राहते. शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

तानाजी गायधने,

कृषिभूषण पुरस्कारप्राप्त, शेतकरी चिखली.

कोट

माझ्याकडे दोन बोअरवेल आहेत. पण लाईट राहत नसल्याने काहीच उपयोग होत नाही. अजूनही माझी एक एकर रोवणी रखडली आहे. बळीराजावर संकट कायम असल्याने शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करुन शासकीय मदत द्यावी.

संजय आकरे, खरबी नाका

कोट

मंगळवारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरीही सध्या धान पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचनाची सोय आहे. मात्र विजेअभावी शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेत कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सिंचन योजना तसेच आधुनिक पीक पद्धतीचे फायदे सांगून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

बॉक्स

भगवंता आमची अशी परीक्षा बघू नको ...

जिल्ह्यातील बळीराजा देवाला पावसासाठी साकडे घालत आहेत. काहीही होऊ दे पण पाऊस पडू दे, बळीराजाची अशी सत्व परीक्षा भगवंता पाहू नको. आमच्यावरच दुष्काळाचे संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडून चांगले उत्पन्न होऊ दे अशी प्रार्थना अनेक ठिकाणी मंदिरातून केली जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय राेवणी

तालुका क्षेत्र प्रत्यक्ष टक्केवारी

भंडारा १००

मोहाडी ७०

तुमसर ९४

पवनी १३७

साकोली ८३

लाखांदूर ९६

लाखनी ८७

एकूण ९४