शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विसर्जनानंतर मिस्कीन टँक तलावाची स्थिती भयावह

By admin | Updated: September 9, 2015 00:26 IST

जिल्हयात मोठ्या थाटात विविध सण साजरे केले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणोशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते.

निर्माल्यांची विल्हेवाट शून्य : विचारातून व्हावी प्रगल्भतेची जाणीव भंडारा : जिल्हयात मोठ्या थाटात विविध सण साजरे केले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणोशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. विशेषत: घरात स्थापित करण्यात आलेल्या मूर्र्तींचेही मोठ्या प्रमाणात तलाव, बोळ्या किंवा नदीत विसर्जन केले जाते. दोन दिवसांपूर्वीच शहरातील मिस्कीन टँक तलावात कृष्णमूर्तींच्या विसर्जनानंतर तलावाच्या बिकट स्थितीत अजुनच भर पडली.धार्मिक सण साजरा करणे हा मुलभूत अधिकारांपैकी एक व तेवढाच मानवी संवेदनाशी जुळला विषय आहे. ‘पीओपी’च्या मूर्ती नकोभंडारा : मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या लाडक्या देवतेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. धर्मशास्त्राच्या नियमानुसार पूजन केलेल्या मूर्तीचे विसर्जन करणे हा धार्मिक पूजा विधीतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला गेला आहे. अनादी काळापासून मूर्ती विसर्जनाची परंपरा चालत आलेली आहे. आधुनिकतेच्या शिरकावामुळे तयार करण्यात येणाऱ्या भगवंतांच्या मूर्तीमध्येही बदल होत गेले. मातीची जागा काही प्रमाणात ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’ने घेतली. रसायनांचा अतिवापरही वाढला. मानवी जीवनासाठी घातक ठरणारी रसायने मूर्तींना आकर्षक बनविण्यासाठी वापरली जावू लागली. दुसरीकडे लोकसंख्या वाढ, नागरी वस्तीचे वाढते आकारमान आदी कारणांमुळे तलाव व बोळ्यांवरही अतिक्रमण झाले. भंडाऱ्यातील मिस्कीन तलाव अतिक्रमणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. उत्सवादरम्यान घरगुतीसह सार्वजनिक मंडळातील मूर्र्तींचे विसर्जन या तलावात होत आले आहे. आधीच अतिक्रमणामुळे तलावाचे आकारमान कमी होत असताना विसर्जनाच्या प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेला फाटा देण्याचे कामही भाविकांकडून होत गेले व आजही सुरूच आहे. मूर्तीसह निर्माल्यांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेवरही सर्रास दुर्लक्ष करण्यात येते. सद्यस्थितीत मिस्कीन (टँक) तलावात एका मच्छिमार संस्थेतर्फे शिंगाड्याचे उत्पादन घेतले जात आहे. काल परवा मूर्तीच्या विसर्जनानंतर मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळल्या ; परंतु निर्माल्य तथा लाकडी पाट्यांची विल्हेवाट लावण्यात आली नाही. ज्या ढिकाणी विसर्जन केले जाते त्या तलावाच्या पाळीवर निर्माल्य गोळा करण्यासाठी नगर पालिका प्रशासनातर्फे दोन ड्रम ठेवण्यात आले. मात्र त्यात कुठल्याही भाविकाने निर्माल्य घालण्याची तसदी घेतली नाही. पॉलिथीनमध्ये आणलेले निर्माल्य तलावात सर्रासपणे फेकण्यातच धन्यता मानण्यात आली. हाच प्रकार सागर तलाव तथा वैनगंगा नदी काठावरही दिसून आला. जनजागृती करूनही जागृतीचा फज्जा झाल्याचा दिसून आला. दुर्गंधी अन् अस्वच्छतेचा कळस मानवी आरोग्याला अपाय ठरतेच, हेही तेढेच सत्य आहे. (प्रतिनिधी)