शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनानंतर मिस्कीन टँक तलावाची स्थिती भयावह

By admin | Updated: September 9, 2015 00:26 IST

जिल्हयात मोठ्या थाटात विविध सण साजरे केले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणोशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते.

निर्माल्यांची विल्हेवाट शून्य : विचारातून व्हावी प्रगल्भतेची जाणीव भंडारा : जिल्हयात मोठ्या थाटात विविध सण साजरे केले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणोशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. विशेषत: घरात स्थापित करण्यात आलेल्या मूर्र्तींचेही मोठ्या प्रमाणात तलाव, बोळ्या किंवा नदीत विसर्जन केले जाते. दोन दिवसांपूर्वीच शहरातील मिस्कीन टँक तलावात कृष्णमूर्तींच्या विसर्जनानंतर तलावाच्या बिकट स्थितीत अजुनच भर पडली.धार्मिक सण साजरा करणे हा मुलभूत अधिकारांपैकी एक व तेवढाच मानवी संवेदनाशी जुळला विषय आहे. ‘पीओपी’च्या मूर्ती नकोभंडारा : मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या लाडक्या देवतेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. धर्मशास्त्राच्या नियमानुसार पूजन केलेल्या मूर्तीचे विसर्जन करणे हा धार्मिक पूजा विधीतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला गेला आहे. अनादी काळापासून मूर्ती विसर्जनाची परंपरा चालत आलेली आहे. आधुनिकतेच्या शिरकावामुळे तयार करण्यात येणाऱ्या भगवंतांच्या मूर्तीमध्येही बदल होत गेले. मातीची जागा काही प्रमाणात ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’ने घेतली. रसायनांचा अतिवापरही वाढला. मानवी जीवनासाठी घातक ठरणारी रसायने मूर्तींना आकर्षक बनविण्यासाठी वापरली जावू लागली. दुसरीकडे लोकसंख्या वाढ, नागरी वस्तीचे वाढते आकारमान आदी कारणांमुळे तलाव व बोळ्यांवरही अतिक्रमण झाले. भंडाऱ्यातील मिस्कीन तलाव अतिक्रमणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. उत्सवादरम्यान घरगुतीसह सार्वजनिक मंडळातील मूर्र्तींचे विसर्जन या तलावात होत आले आहे. आधीच अतिक्रमणामुळे तलावाचे आकारमान कमी होत असताना विसर्जनाच्या प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेला फाटा देण्याचे कामही भाविकांकडून होत गेले व आजही सुरूच आहे. मूर्तीसह निर्माल्यांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेवरही सर्रास दुर्लक्ष करण्यात येते. सद्यस्थितीत मिस्कीन (टँक) तलावात एका मच्छिमार संस्थेतर्फे शिंगाड्याचे उत्पादन घेतले जात आहे. काल परवा मूर्तीच्या विसर्जनानंतर मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळल्या ; परंतु निर्माल्य तथा लाकडी पाट्यांची विल्हेवाट लावण्यात आली नाही. ज्या ढिकाणी विसर्जन केले जाते त्या तलावाच्या पाळीवर निर्माल्य गोळा करण्यासाठी नगर पालिका प्रशासनातर्फे दोन ड्रम ठेवण्यात आले. मात्र त्यात कुठल्याही भाविकाने निर्माल्य घालण्याची तसदी घेतली नाही. पॉलिथीनमध्ये आणलेले निर्माल्य तलावात सर्रासपणे फेकण्यातच धन्यता मानण्यात आली. हाच प्रकार सागर तलाव तथा वैनगंगा नदी काठावरही दिसून आला. जनजागृती करूनही जागृतीचा फज्जा झाल्याचा दिसून आला. दुर्गंधी अन् अस्वच्छतेचा कळस मानवी आरोग्याला अपाय ठरतेच, हेही तेढेच सत्य आहे. (प्रतिनिधी)