शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

मृत्यूनंतरही ‘शिल्पा’च्या मृतदेहाची फरफट

By admin | Updated: February 22, 2015 00:30 IST

शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मृत्युमुखी पडलेल्या शिल्पाच्या मृतदेहावर अंत्यसंकारासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. दरम्यान, शिल्पाच्या मृतदेहाला अंत्यविधी ...

प्रशांत देसाई  भंडाराशुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मृत्युमुखी पडलेल्या शिल्पाच्या मृतदेहावर अंत्यसंकारासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. दरम्यान, शिल्पाच्या मृतदेहाला अंत्यविधी स्थळापर्यंत पोचण्यासाठी पवनी ते भंडारा आणि भंडारा ते पवनी असा चार वेळा प्रवास करावा लागला.वलनी येथील शिल्पा जांभुळकरचा शुक्रवारी सकाळी निर्दयपणे खून झाला होता. पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त जमावाने मृतदेह सहा तास उचलला नाही. शवविच्छेदनासाठी भंडारा व येथून वलनी अशा चार फेऱ्या मृतदेहाला घालाव्या लागल्या. अंत्यसंस्कारासाठी या मृतदेहाला २०० कि़मी. चा प्रवास करावा लागल्याने मेंदूच्या झिणझिण्या उडाल्या. आसगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या शिल्पावर गावातीलच देवा गभनेने कोयत्याने हल्ला करून हत्या केली. याची माहिती होताच मृतकाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून पोलीस प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. पवनी पोलिसांनी या प्रकरणाची वेळीच दखल घेतली असती तर शिल्पा हत्याकांड घडले नसते, असा आरोप नातेवाईकांनी करून एसडीपीओ, पोलीस निरीक्षक व दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली. निलंबन होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतल्याने सहा तास मृतदेह घटनास्थळावर पळून होता. घटनेला काही राजकीय पक्षानी वळण देवून नातेवाईकांच्या भावना रेटून धरल्या. पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन मृतदेह शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उत्तरीय तपासणीकरिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. येथे शिवसैनिकांनी शिल्पाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली. तणावाच्या परिस्थितीत पोलीस बंदोबस्तात शिल्पाचे रात्री शवविच्छेदन करण्यात आले. रात्री १० वाजताच्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात शिल्पाचा मृतदेह वलनी येथे नेला. मात्र गावकऱ्यांमध्ये असलेला असंतोष बघून पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मृतदेह पून्हा भंडाऱ्याला आणला. सकाळपासून रात्रीपर्यंत शिल्पाच्या मृत्युनंतरही तिच्या मृतदेहाचीही अवहेलना सुरूच होती. आज सकाळपासून ग्रामस्थ व नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी रेटून धरत खैरी चौरस्ता रोखून धरला. अशास्थितीत शिल्पाचा मृतदेह भंडारा सामान्य रुग्णालयातील शवगृहात पडून होता. वलनी फाट्यावर रास्तारोको करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथकाला चौरस्त्यावर तैनात केले होते. जिल्हा अधिक्षक कैलास कणसे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळ गाठून मृतकाच्या नातेवाईकाला व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी तणाव निवळल्यानंतर मृतदेह भंडारा येथून वलनी येथे नेण्यात आला व सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तणावपूर्ण स्थितीत व शोकाकूल वातावरणात तिच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवनी ते भंडारा व भंडारा ते पवनी मार्गे वलनी असा २०० कि़मी.चा चार फेऱ्यांचा प्रवास केल्यानंतर तब्बल २४ तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.