शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्यांची मृत्यूनंतरही उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:39 IST

राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी जिवाचे रान पेटवून देणाऱ्या तसेच स्वातंत्र्य चळवळीत गौरवास्पद कार्य व सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा मृत्यु झाल्यास त्यांचे अंतिम संस्कार शासकीय ईत्यामात करण्याचे आदेश आहेत. मात्र तुमसरच्या अधिकाऱ्यांना त्या आदेशाचा विसर पडल्याने त्या विर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे अंतिम संस्कार करून स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्या त्या ...

ठळक मुद्देशासकीय ईतमामाचा विसर : अंत्यसंस्कारापूर्वी देण्यात येणारी आर्थिक मदतही नाही

राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी जिवाचे रान पेटवून देणाऱ्या तसेच स्वातंत्र्य चळवळीत गौरवास्पद कार्य व सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा मृत्यु झाल्यास त्यांचे अंतिम संस्कार शासकीय ईत्यामात करण्याचे आदेश आहेत. मात्र तुमसरच्या अधिकाऱ्यांना त्या आदेशाचा विसर पडल्याने त्या विर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे अंतिम संस्कार करून स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्या त्या विरांच्या मृत्युनंतर उपेक्षा झालयाचा प्रकार घडला.विश्वनाथ नत्थू भाजीपाले असे त्या वीर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे नाव आहे. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९३० साली झाला. सन १९४२ च्या चले जाव चळवळीत इंग्रजांनी त्यांच्या पायावर गोळी झाळून जखमी केल ेहोते व त्यानंतर त्यांना ११ महिने ११ दिवसाचा कारावास मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे भोगावा लागला होता. त्या गौरवास्पद कार्याची दखल घेत सन १९७२ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते तामप्रपत्र ही देण्यात आले होते.तेव्हापासूनच त्यांना पेन्शन व सर्व शासकीय सुविधांचा लाभ मिळत होता. दरम्यान ३ मार्च २०१८ रोजी त्यांचा वृद्धापकाळाने सायंकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला असता वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी असल्यामुळे त्यांच्या मुलाने तहसिल कार्यालयात माहिती देण्यासाठी दुरध्वनी केला. मात्र एकदाही फोन उचलण्यात आले नसल्याने त्यांनी तलाठीला माहिती दिली तेव्हा कुठेतरी दुसºया दिवसी अंतिम संस्काराला नेत्यावेळी शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यालयातील एका कर्मचाºयाला पाठविण्यात आले. तेव्हा पोलीस अधिकारी असे एक एकच आले व पुष्पचक्र घालून निघून गेलेत. परंतू त्या विर सेनानीच्या शवाला तिरंग्यात गुंडाळण्याचे ते विसरले इतकेच नव्हे तर अंतिम संस्कारापुर्वी परिवाराला देण्यात येणारी आर्थिक मदत दिली नाही. ईतकेच नव्हे तर ज्यावेळी विर स्वातंत्र्य संग्राम सेनानी विश्वनाथ भाजीपाले यांचा पार्थिव हुतात्मा स्मारकाजवळ आणण्यात आले. त्यावेळी एकही पोलीस तिथे नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात जिवाचे राण करणाºयांच्या पार्थिवावर गोळ्या झाडून सलामी दिली नाही तरी चालले असते मात्र त्यांचा पार्थिवावर तिरंगा गुंडाळला असता व त्यांच्या सम्मानात दोन चार पोलीस येवून श्रद्धांजली दिली असती तरी पुरेशे होते मात्र अशा प्रकारची अवमानना करण्याचा प्रकार पहिलांदाच तुमसरात घडला, असा प्रकार इतर स्वातंत्र्य संग्राम सेनानीशी घडू नये व दोषीवर कारवाई व्हावी याकरिता विश्वनाथ भाजीपाले यांच्या कुटुंबियांनी पत्रपरिषदेत मागणी केली आहे. यावेळी विजय विश्वनाथ भाजीपाले, प्रविण पाटील, कला पाटील, शिला देशमुख, भाष्कर देशमुख उपस्थित होते.