शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

अखेर उपोषणकर्त्यांसमोर झुकले प्रशासन

By admin | Updated: December 20, 2014 00:40 IST

तालुका प्रशासनाने शासनाला सादर केलेले पैसेवारी चूकीची असल्याचा आरोप करीत त्यात सुधारणा करण्याचा आग्रह आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनावर भोवला.

लाखांदूर : तालुका प्रशासनाने शासनाला सादर केलेले पैसेवारी चूकीची असल्याचा आरोप करीत त्यात सुधारणा करण्याचा आग्रह आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनावर भोवला. अगदी एका दिवसात नजरअंदाज आणेवारी ६५ टक्क्यावरुन ४८ टक्के असल्याचे शासनाला पत्र पाठविल्यानंतरच उपोषणाची सांगता झाली. उपोषण कर्त्यापुढे प्रशासन झुकल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे.शासनाला तालुक्याची प्रयोगानुसार पैसेवारी दरवर्षी पाठवावी लागले. यंदा तालुका प्रशासनाने पाठवलेली पैसेवारी ही खोटी असून कोणत्या आधारावर आणेवारी काढली म्हणून त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी तहसिल कार्यालयापुढे १६ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले होते.तालुक्यातील ३० गावांचा पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे सांगून तथा अहवाल शासनाला सादर करण्याचा आग्रह करण्यात आला. परंतु प्रशासनाने उपोषणकर्त्यांची योग्य दखल न घेतल्याने अखेर १८ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा निर्णय शेतकऱ्यानी घेतल्यानंतर प्रशासन जागे झाले. तात्काळ उपोषण कर्त्यांसोबत तहसिलदार विजय पवार यांनी पोलिस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांचे सहकार्याने चर्चा घडवून आली.तत्पूर्वी तहसिलदार व महसूल विभाग सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करुन तालुक्यातील ३० गावांचा पैसेवारीत सूधारणा करुन ६५ पैशावरील ४८ पैशापेक्षा कमी आणेवारीत दुरुस्ती करण्यात आली. तत्पूर्वी तालुक्याची पैसेवारी ६५ पैसे शासनाला सादर करण्यात आली होती. ती नजर अंदाज आणेवारी चक्क ४८ टक्क्यावर आणून ३० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखवून तात्काळ शासनाला अहवाल सादर करण्यात आला.तालुक्यात ७९ गावे व ६३ ग्रामपंचायती आहेत. काही गावात गावात सिचंनाची साधने असली तरी जैतपूर, बारव्हा, पारडी, मुरमाडी, चिकना, नावशी, मासळ, बेलाटी या भागातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यंदा पावसाचा लपंडाव यामुळे संपूर्ण धान शेती संकटात आली असतांना प्रशासनाने आणेवारी ६५ पैशापेक्षा जास्त दर्शवली होती. इंग्रजकालीन आणेवारीची पशुधन शेतकऱ्यांसाठी मारक असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले. एकाच दिवशी कार्यालयात बसल्याने प्रयोगानुसार तालुक्याची पैसेवारी ६५ पैशावरुन ५० पैशापेक्षा कमी कशी काय होवू शकते, हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन बसला तरी. यानंतर आणेवारीचा विरोध केल्यानंतरच प्रशासन सूधारणा आणेवारीत करणार का. असा प्रश्न ५० पैशापेक्षा जास्त आणेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.शासनाला सुधारित आणेवारी सादर केल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी चंद्रशेखर टेंभूर्णे, तहसिलदार विजय पवार, पोलिस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी, शिलमंतू सिव्हगडे, सरपंच दिघोरी, शंकर खराब, विलास ढोरे, बालू चुन्ने, विश्वनाथ तरोणे व अनेक शेतकरी उपस्थित होते. उपोषण कर्त्यापुढे प्रशासन झुकल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे.(तालुका प्रतिनिधी)