शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उपोषणकर्त्यांसमोर झुकले प्रशासन

By admin | Updated: December 20, 2014 00:40 IST

तालुका प्रशासनाने शासनाला सादर केलेले पैसेवारी चूकीची असल्याचा आरोप करीत त्यात सुधारणा करण्याचा आग्रह आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनावर भोवला.

लाखांदूर : तालुका प्रशासनाने शासनाला सादर केलेले पैसेवारी चूकीची असल्याचा आरोप करीत त्यात सुधारणा करण्याचा आग्रह आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनावर भोवला. अगदी एका दिवसात नजरअंदाज आणेवारी ६५ टक्क्यावरुन ४८ टक्के असल्याचे शासनाला पत्र पाठविल्यानंतरच उपोषणाची सांगता झाली. उपोषण कर्त्यापुढे प्रशासन झुकल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे.शासनाला तालुक्याची प्रयोगानुसार पैसेवारी दरवर्षी पाठवावी लागले. यंदा तालुका प्रशासनाने पाठवलेली पैसेवारी ही खोटी असून कोणत्या आधारावर आणेवारी काढली म्हणून त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी तहसिल कार्यालयापुढे १६ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले होते.तालुक्यातील ३० गावांचा पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे सांगून तथा अहवाल शासनाला सादर करण्याचा आग्रह करण्यात आला. परंतु प्रशासनाने उपोषणकर्त्यांची योग्य दखल न घेतल्याने अखेर १८ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा निर्णय शेतकऱ्यानी घेतल्यानंतर प्रशासन जागे झाले. तात्काळ उपोषण कर्त्यांसोबत तहसिलदार विजय पवार यांनी पोलिस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांचे सहकार्याने चर्चा घडवून आली.तत्पूर्वी तहसिलदार व महसूल विभाग सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करुन तालुक्यातील ३० गावांचा पैसेवारीत सूधारणा करुन ६५ पैशावरील ४८ पैशापेक्षा कमी आणेवारीत दुरुस्ती करण्यात आली. तत्पूर्वी तालुक्याची पैसेवारी ६५ पैसे शासनाला सादर करण्यात आली होती. ती नजर अंदाज आणेवारी चक्क ४८ टक्क्यावर आणून ३० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखवून तात्काळ शासनाला अहवाल सादर करण्यात आला.तालुक्यात ७९ गावे व ६३ ग्रामपंचायती आहेत. काही गावात गावात सिचंनाची साधने असली तरी जैतपूर, बारव्हा, पारडी, मुरमाडी, चिकना, नावशी, मासळ, बेलाटी या भागातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यंदा पावसाचा लपंडाव यामुळे संपूर्ण धान शेती संकटात आली असतांना प्रशासनाने आणेवारी ६५ पैशापेक्षा जास्त दर्शवली होती. इंग्रजकालीन आणेवारीची पशुधन शेतकऱ्यांसाठी मारक असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले. एकाच दिवशी कार्यालयात बसल्याने प्रयोगानुसार तालुक्याची पैसेवारी ६५ पैशावरुन ५० पैशापेक्षा कमी कशी काय होवू शकते, हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन बसला तरी. यानंतर आणेवारीचा विरोध केल्यानंतरच प्रशासन सूधारणा आणेवारीत करणार का. असा प्रश्न ५० पैशापेक्षा जास्त आणेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.शासनाला सुधारित आणेवारी सादर केल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी चंद्रशेखर टेंभूर्णे, तहसिलदार विजय पवार, पोलिस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी, शिलमंतू सिव्हगडे, सरपंच दिघोरी, शंकर खराब, विलास ढोरे, बालू चुन्ने, विश्वनाथ तरोणे व अनेक शेतकरी उपस्थित होते. उपोषण कर्त्यापुढे प्रशासन झुकल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे.(तालुका प्रतिनिधी)