शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

अपघातानंतर दोन्ही ट्रक पेटले, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:40 IST

भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.

ठळक मुद्देशिंगोरी येथील घटना : डिझेल टँक फुटल्याने घडला अनर्थ, अग्नीशमनच्या दोन बंबांनी विझविली आग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.घनश्याम सदाशिव वाडीवा (३२) रा.मुरमाडी (लाखनी) असे मृताचे नाव आहे. तर अजय योगराज सोनवने (२०) रा.कन्हान जि. नागपूर असे जखमीचे नाव आहे. या आगीत घनश्यामचा जळून कोळसा झाला होता. सोमवारी सायंकाळी खरबीवरून धान रिकामे करून ट्रक क्रमांक सीजी ०४ जेसी ३२३५ लाखनीकडे जात होता. तर साकोलीकडून ट्रक क्रमांक एमएच ४० बीजे ७००१ हा नागपुरकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी गावाजवळ या दोन ट्रकची टक्कर झाली. टक्कर एवढी भीषण होती की, घर्षणानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला. त्यातच डिझेलची टाकी फुटल्याने मोठा अनर्थ घडला. अपघात घडताच ट्रकमधील चालक - वाहकांनी उड्या टाकल्या. मात्र घनश्याम वाडीवा हा आगीच्या ज्वाळात सापडला. अवघ्या काही वेळातच त्याचा जळून कोळसा झाला.या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. कारधाचे ठाणेदार गजानन कंकाळे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली फटींग यांच्यासह व जिल्हा वाहतूक शाखेचे बाळकृष्ण गाडे घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या दोन वाहनांनी या आगीवर काही वेळानंतर नियंत्रण मिळविले. प्रत्यक्षदर्शीनुसार हा अपघात अतीवेगाने झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी प्रमोद शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघात घडला तेव्हा तेथे वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. आग विझविणे अशक्य दिसत होते. तसेच डिझेलच्या टँकच्या स्फोटाचीही भीती असल्याने कुणी जवळ जाण्याची हिंमत करीत नव्हता.महामार्गावर तीन तास वाहतूक ठप्पअतीशय व्यस्त राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक पेटत असल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. वाहनांच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कारखान्यातील रात्रपाळी आटोपून घरी परतणारे कर्मचारीही यात अडकले होते. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.