शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर दोन्ही ट्रक पेटले, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:40 IST

भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.

ठळक मुद्देशिंगोरी येथील घटना : डिझेल टँक फुटल्याने घडला अनर्थ, अग्नीशमनच्या दोन बंबांनी विझविली आग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.घनश्याम सदाशिव वाडीवा (३२) रा.मुरमाडी (लाखनी) असे मृताचे नाव आहे. तर अजय योगराज सोनवने (२०) रा.कन्हान जि. नागपूर असे जखमीचे नाव आहे. या आगीत घनश्यामचा जळून कोळसा झाला होता. सोमवारी सायंकाळी खरबीवरून धान रिकामे करून ट्रक क्रमांक सीजी ०४ जेसी ३२३५ लाखनीकडे जात होता. तर साकोलीकडून ट्रक क्रमांक एमएच ४० बीजे ७००१ हा नागपुरकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी गावाजवळ या दोन ट्रकची टक्कर झाली. टक्कर एवढी भीषण होती की, घर्षणानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला. त्यातच डिझेलची टाकी फुटल्याने मोठा अनर्थ घडला. अपघात घडताच ट्रकमधील चालक - वाहकांनी उड्या टाकल्या. मात्र घनश्याम वाडीवा हा आगीच्या ज्वाळात सापडला. अवघ्या काही वेळातच त्याचा जळून कोळसा झाला.या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. कारधाचे ठाणेदार गजानन कंकाळे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली फटींग यांच्यासह व जिल्हा वाहतूक शाखेचे बाळकृष्ण गाडे घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या दोन वाहनांनी या आगीवर काही वेळानंतर नियंत्रण मिळविले. प्रत्यक्षदर्शीनुसार हा अपघात अतीवेगाने झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी प्रमोद शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघात घडला तेव्हा तेथे वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. आग विझविणे अशक्य दिसत होते. तसेच डिझेलच्या टँकच्या स्फोटाचीही भीती असल्याने कुणी जवळ जाण्याची हिंमत करीत नव्हता.महामार्गावर तीन तास वाहतूक ठप्पअतीशय व्यस्त राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक पेटत असल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. वाहनांच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कारखान्यातील रात्रपाळी आटोपून घरी परतणारे कर्मचारीही यात अडकले होते. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.