शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

अपघातानंतर दोन्ही ट्रक पेटले, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:40 IST

भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.

ठळक मुद्देशिंगोरी येथील घटना : डिझेल टँक फुटल्याने घडला अनर्थ, अग्नीशमनच्या दोन बंबांनी विझविली आग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.घनश्याम सदाशिव वाडीवा (३२) रा.मुरमाडी (लाखनी) असे मृताचे नाव आहे. तर अजय योगराज सोनवने (२०) रा.कन्हान जि. नागपूर असे जखमीचे नाव आहे. या आगीत घनश्यामचा जळून कोळसा झाला होता. सोमवारी सायंकाळी खरबीवरून धान रिकामे करून ट्रक क्रमांक सीजी ०४ जेसी ३२३५ लाखनीकडे जात होता. तर साकोलीकडून ट्रक क्रमांक एमएच ४० बीजे ७००१ हा नागपुरकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी गावाजवळ या दोन ट्रकची टक्कर झाली. टक्कर एवढी भीषण होती की, घर्षणानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला. त्यातच डिझेलची टाकी फुटल्याने मोठा अनर्थ घडला. अपघात घडताच ट्रकमधील चालक - वाहकांनी उड्या टाकल्या. मात्र घनश्याम वाडीवा हा आगीच्या ज्वाळात सापडला. अवघ्या काही वेळातच त्याचा जळून कोळसा झाला.या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. कारधाचे ठाणेदार गजानन कंकाळे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली फटींग यांच्यासह व जिल्हा वाहतूक शाखेचे बाळकृष्ण गाडे घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या दोन वाहनांनी या आगीवर काही वेळानंतर नियंत्रण मिळविले. प्रत्यक्षदर्शीनुसार हा अपघात अतीवेगाने झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी प्रमोद शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघात घडला तेव्हा तेथे वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. आग विझविणे अशक्य दिसत होते. तसेच डिझेलच्या टँकच्या स्फोटाचीही भीती असल्याने कुणी जवळ जाण्याची हिंमत करीत नव्हता.महामार्गावर तीन तास वाहतूक ठप्पअतीशय व्यस्त राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक पेटत असल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. वाहनांच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कारखान्यातील रात्रपाळी आटोपून घरी परतणारे कर्मचारीही यात अडकले होते. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.