शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

५४ दिवसानंतरही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 21, 2016 00:29 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत.

सर्व शिक्षा अभियानाचा फज्जा : विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित, पालकांमध्ये असंतोषविशाल रणदिवे अड्याळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविल्या जाते. मात्र ५४ दिवसाच्या शैक्षणिक सत्रात अड्याळ येथील विद्यार्थी पुस्तकाच्या प्रतिक्षेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात आहे. यावर राज्य शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तक वितरीत करावे, असे निर्बंध घातले आहे. यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती संस्थेकडून उन्हाळ्यातच शिक्षण विभागाला पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळा सुरू होण्यापुर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून संबंधित पंचायत समिती व तिथून शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.पुस्तके मिळाली असली तरी अनेक विषयांचे पुस्तके कमी प्रमाणात पाठविल्याने अनेकांना अद्यापही पुस्तकांचा पुर्ण संग्रह मिळालेला नाही. अनेक विद्यार्थी पुस्तकापासून वंचित असल्याने शैक्षणिक सत्र सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही त्यांना शाळेत अन्य विषयाचे अभ्यासक्रम हाताळावे लागत आहे. अनेक शाळांमध्ये पहिल्या सत्रातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे पुस्तक उपलब्ध नसल्याने अनेकांची शैक्षणिक बोळवण होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. याबाबत शिक्षण विभागाला विचारणा केली असता त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला माहिती दिली असून त्यांच्याकडून वेळेत पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. शिवसेना तालुका प्रमुख राजु ब्राम्हणकर व ग्रामपंचायत सदस्य महेश गभने यांनी पुस्तकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षण विभागाने त्वरीत पुस्तकांचे वाटप करावे, अशी मागणी केली आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी बाजारपेठेत पुस्तकांची पाहणी केली मात्र तिथेही पुस्तक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविली जातात. दरम्यान अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय, अड्याळ विद्यालय अड्याळ, प्रकाश विद्यालय अड्याळ व विवेकानंद विद्या भवन विद्यालय अड्याळ या चार विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतिक्षेत आजही आहेत. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांना पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वळती करण्यात आली. मात्र पुस्तक कधी उपलब्ध होईल, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. मात्र ५४ दिवसांच्या कालावधीनंतरही पुस्तके अप्राप्त असल्याने यालाच सर्व शिक्षा अभियान म्हणायचे काय? असा संतप्त प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.आमच्याकडे जेवढी पुस्तके पुरविण्यात आली त्या सर्व पुस्तकांचा शाळांना पुरवठा करण्यात आला. अतिरिक्त पुस्तकांची मागणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. -एन. टी. टिचकुले, गटशिक्षणाधिकारी पवनी.पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. परंतु पुस्तकच उपलब्ध झालेले नाही. पुस्तके प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येईल.-के. डी. भुरे, विस्तार अधिकारी, पवनी.शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पुस्तक मिळावी यासाठी वारंवार मागणी करण्यात आली आहे. पुस्तक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.-व्ही. एस. जगनाडे, मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय अड्याळ.