शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

अड्याळ गाव तसे चांगले, पण समस्यांनी वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST

अड्‌याळ : गावातील समस्या काही नवीन नाहीत. अनेक वर्षे झाली, अनेक ग्रामपंचायत प्रशासन आले आणि गेलेत, परंतु गावातील ज्या ...

अड्‌याळ : गावातील समस्या काही नवीन नाहीत. अनेक वर्षे झाली, अनेक ग्रामपंचायत प्रशासन आले आणि गेलेत, परंतु गावातील ज्या अति महत्त्वाच्या समस्या आहेत, त्या आजही सुटलेल्या तर नाहीतच, पण उलट गावातील विविध समस्यांत वाढही झाली आहे.

अड्‌याळ ग्रामवासीयांनी १३ ऑगस्ट रोजी गुजरी चौकातील मुन्ना हॉल येथे बैठक घेतली. त्यात १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले आहे. त्यात माजी शिक्षण राज्यमंत्री यांच्यासोबत एक शिष्टमंडळ जाणार आहे. या बैठकीत माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार, डॉ. उल्हास हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, राजेंद्र ब्राम्हाणकर, नंदलाल मेश्राम, मुनिश्वर बोदलकर तंटामुक्त समिती अध्यक्ष, नितीन वर्गांटीवर, अमोल उराडे, आशिक नैतामे, कमलेश जाधव, शुभांगी पवार, ताराबाई कुंभलकर आदी महिला, पुरुष वर्ग तथा युवक मंडळी गावसमस्या चर्चेत उपस्थित होती.

गावातील पथदिवे गेल्या दीड महिन्यापासून बंद, गावात अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गावातील तथा गावाबाहेर स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण, नायब तहसील कार्यालय आहे, तसेच ग्रामविकास अधिकारी ठरलेल्या दिवसात सुद्धा वेळेवर येत नाही, पण पूर्णवेळही ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी लाभला नाही. गावात पाणीपुरवठा होणाऱ्या पंप हाऊसमध्ये कर्मचाऱ्यांना अद्याप क्वार्टर बांधून मिळाले नाहीत वा जमीनही मिळाली नाही. तसेच गावातील ले आऊटमधील ग्रामपंचायतीला मिळालेले प्लॉट सुद्धा ग्रामपंचायतीच्या नावावर तर झाले नाहीतच, पण लाखोंची नळ योजना, तिलाही ग्रहण लागले आहे. तसेच आजपर्यंत येथील बसस्थानकाचा प्रश्न... अशा विविध समस्यांनी येथील ग्रामस्थ त्रस्त आहेत. यासाठी माजी शिक्षण राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अड्‌याळ येथील एक पाचसदस्यीय शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती आहे.