शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

शुद्ध पाण्यासाठी अड्याळवासीयांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

अड्याळ : पंधरा वर्षे झालीत अड्याळ ग्रामपंचायत प्रशासन शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्यासाठी धावपळ करते आहे. दुसरी कशी तरी चालली ...

अड्याळ : पंधरा वर्षे झालीत अड्याळ ग्रामपंचायत प्रशासन शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्यासाठी धावपळ करते आहे. दुसरी कशी तरी चालली आणि तिसऱ्या फेरीत दोनदा निवडणुका झाल्यात सर्व वेळ रस्सीखेच करण्यात गेले,नळ योजनेची कामे जिथल्या तिथंच राहिली. पण शोकांतिका अशी आहे की आजही ग्रामस्थांना मात्र पिण्याचे शुद्ध पाणीसुध्दा मिळेनासे झाले आहे. ना नवीन फिल्टर प्लांट तयार करण्यात आले, ना नळ योजनेच्या कामावर लक्ष दिले. सोमवारी अड्याळ ग्रामस्थांना अशुद्ध पाणी मिळाले. नळाला आलेले पाणी हे पिण्यायोग्य तर नव्हतेच पण वापरण्यायोग्यसुद्धा नव्हते. यामुळे गावात साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. गावातील नळ योजनेचा फज्जा उडाला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन ग्रामपंचायत प्रशासन तथा संबंधित अधिकारी याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. दोन वर्षे झाली रस्ते नाली खोदकाम करून, नवीन नळयोजनेची पाईपलाईन करून, पण शासनाच्या लाखो रुपयांचा उपयोग शून्य. गावात एक नाही दोन नाही तर तब्बल तीनदा नळ योजनेची कामे करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष तथा अधिकाऱ्यांच्या व राजकीय पाठबळावर काही मंडळींनी आपले हित साधून घेतले तर अड्याळ ग्रामवासीयांचे अहित झाले.

गावात अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाय म्हणून लाखोंची नळ योजनेची कामे करण्यात आली आहे, पण तरीही अड्याळ ग्रामवासीयांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेनासे झाले आहे. गावातील चहा नाश्ता, हॉटेलमध्ये हेच पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामुळेसुद्धा साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही.