शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

शुद्ध पाण्यासाठी अड्याळवासीयांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

अड्याळ : पंधरा वर्षे झालीत अड्याळ ग्रामपंचायत प्रशासन शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्यासाठी धावपळ करते आहे. दुसरी कशी तरी चालली ...

अड्याळ : पंधरा वर्षे झालीत अड्याळ ग्रामपंचायत प्रशासन शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्यासाठी धावपळ करते आहे. दुसरी कशी तरी चालली आणि तिसऱ्या फेरीत दोनदा निवडणुका झाल्यात सर्व वेळ रस्सीखेच करण्यात गेले,नळ योजनेची कामे जिथल्या तिथंच राहिली. पण शोकांतिका अशी आहे की आजही ग्रामस्थांना मात्र पिण्याचे शुद्ध पाणीसुध्दा मिळेनासे झाले आहे. ना नवीन फिल्टर प्लांट तयार करण्यात आले, ना नळ योजनेच्या कामावर लक्ष दिले. सोमवारी अड्याळ ग्रामस्थांना अशुद्ध पाणी मिळाले. नळाला आलेले पाणी हे पिण्यायोग्य तर नव्हतेच पण वापरण्यायोग्यसुद्धा नव्हते. यामुळे गावात साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. गावातील नळ योजनेचा फज्जा उडाला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन ग्रामपंचायत प्रशासन तथा संबंधित अधिकारी याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. दोन वर्षे झाली रस्ते नाली खोदकाम करून, नवीन नळयोजनेची पाईपलाईन करून, पण शासनाच्या लाखो रुपयांचा उपयोग शून्य. गावात एक नाही दोन नाही तर तब्बल तीनदा नळ योजनेची कामे करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष तथा अधिकाऱ्यांच्या व राजकीय पाठबळावर काही मंडळींनी आपले हित साधून घेतले तर अड्याळ ग्रामवासीयांचे अहित झाले.

गावात अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाय म्हणून लाखोंची नळ योजनेची कामे करण्यात आली आहे, पण तरीही अड्याळ ग्रामवासीयांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेनासे झाले आहे. गावातील चहा नाश्ता, हॉटेलमध्ये हेच पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामुळेसुद्धा साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही.