शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्यासाठी अड्याळवासीयांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

अड्याळ : पंधरा वर्षे झालीत अड्याळ ग्रामपंचायत प्रशासन शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्यासाठी धावपळ करते आहे. दुसरी कशी तरी चालली ...

अड्याळ : पंधरा वर्षे झालीत अड्याळ ग्रामपंचायत प्रशासन शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्यासाठी धावपळ करते आहे. दुसरी कशी तरी चालली आणि तिसऱ्या फेरीत दोनदा निवडणुका झाल्यात सर्व वेळ रस्सीखेच करण्यात गेले,नळ योजनेची कामे जिथल्या तिथंच राहिली. पण शोकांतिका अशी आहे की आजही ग्रामस्थांना मात्र पिण्याचे शुद्ध पाणीसुध्दा मिळेनासे झाले आहे. ना नवीन फिल्टर प्लांट तयार करण्यात आले, ना नळ योजनेच्या कामावर लक्ष दिले. सोमवारी अड्याळ ग्रामस्थांना अशुद्ध पाणी मिळाले. नळाला आलेले पाणी हे पिण्यायोग्य तर नव्हतेच पण वापरण्यायोग्यसुद्धा नव्हते. यामुळे गावात साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. गावातील नळ योजनेचा फज्जा उडाला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन ग्रामपंचायत प्रशासन तथा संबंधित अधिकारी याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. दोन वर्षे झाली रस्ते नाली खोदकाम करून, नवीन नळयोजनेची पाईपलाईन करून, पण शासनाच्या लाखो रुपयांचा उपयोग शून्य. गावात एक नाही दोन नाही तर तब्बल तीनदा नळ योजनेची कामे करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष तथा अधिकाऱ्यांच्या व राजकीय पाठबळावर काही मंडळींनी आपले हित साधून घेतले तर अड्याळ ग्रामवासीयांचे अहित झाले.

गावात अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाय म्हणून लाखोंची नळ योजनेची कामे करण्यात आली आहे, पण तरीही अड्याळ ग्रामवासीयांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेनासे झाले आहे. गावातील चहा नाश्ता, हॉटेलमध्ये हेच पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामुळेसुद्धा साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही.