शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

पावसाचे दमदार आगमन; बळीराजा सुखावला

By admin | Updated: September 12, 2016 00:27 IST

पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. सर्वत्र उकाडा सुरु होता. वातावरण तापले होते. घरोघरी तापाचे रुग्ण वाढले होते.

धानपिकाला आधार : मोहाडी व तुमसर तालुक्यात मात्र अपेक्षेप्रमाणे कमी, पावसाची टक्केवारी ६६भंडारा : पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. सर्वत्र उकाडा सुरु होता. वातावरण तापले होते. घरोघरी तापाचे रुग्ण वाढले होते. शेतीला भेगा पडल्या असून पाण्याविना धानपिक पिवळे पडले होते. या पावसामुळे धानपिकाला बऱ्याच प्रमाणात फायदा झाला आहे. या दमदार पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात का असेना सुखावला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ३२.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.पवनी/पालोरा : महिन्याभरापासून रुसलेला वरुणराजा पुन्हा बरसला. पवनी तालुकयात ५३मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून चौरास भागात याचा फायदा होणार आहे. साकोली : तालुक्यात काल रात्री ८ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा कालच्या पावसाने सुखावला आहे. लाखांदूर : तालुक्यात मागील २४ तासात ४१.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून धान व अन्य पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.लाखनी : काल रात्री व आज सकाळी आलेल्या पावसामुळे धान पिकांना संजीवणी मिळाली आहे. पंरतु ज्या ठिकाणी पुर्णपणे रोवणी खोळंबली होती. अश्या ठिकाणी या पावसाचा फायदा होणार नाही.मोहाडी : मागील पंधरा दिवसांपासून पालोरा परिसरात वरुण राजाची कृपा न झाल्यामुळे धान पिक करपले होते. जमिनीला भेगा पडल्या होत्या. पाण्याविना धान पिक धोक्यात आले होते. मात्र वरुणराजाने हजेरी लावली असली तरी अजूनही मुसळधार पावसाची गरज आहे.तुमसर : तालुक्यात मात्र काल फक्त ५.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान क्षेत्र असल्याने पाण्याची गरज आहे. (लोकमत चमू)जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊसजिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ३२.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील २४ तासात भंडारा तालुक्यात ४०.८ मिमी, मोहाडी तालुक्यात १२.४ मिमी, तुमसर ५.२ मिमी, पवनी ५३ मिमी, साकोली ३०.०६ मिमी, लाखांदूर ४१.४ मिमी तर लाखनी तालुक्यात ४५.८ मिमी पाऊस बरसला आहे. आतापर्यंत १ जून पासून बरसलेल्या पावसाची टक्केवारी ६६ इतकी आहे. टक्केवारी बघता पाऊस या प्रमाणात बरसला असला तरी तो सातत्यपूर्ण नसल्यामुळे या टक्केवारीचा फायदा धानपिकाला वेळोवेळी झालेला नाही. कालच्या पावसाने बळीराजा तात्पूरता सुखावला असला तरी अजून मुसळधारपावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढभंडारा : गत १५ दिवसांपासून वातावरण बदलामुळे विषाणूजन्य आजार बळावले आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, तसेच विषाणुजन्य कावीळ रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या ओपीडीत रुग्णांची गर्दी आहे. विशेषत: लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. आॅगस्टमध्ये पाऊस बेपत्ता झाल्याने ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे वातावरण तयार झाले होते. १० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वातावरणात झालेल्या या बदलामुळे साथीचे आजार बळावू लागले आहेत. ओलसर व चिखलमय रस्ते कोरडे पडल्याने वाहने जाताना उडणाऱ्या धुळीमुळे संसर्गजन्य आजार बाळवू लागले आहेत. विशेषत: लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. वातावरणातील या बदलामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध, महिलांही आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी याबरोबरच विषाणुजन्य कावीळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या शहरासह ग्रामीण भागातील लहान लहान दवाखान्यांत रुग्णांची संख्येत चांगलीच वाढ झालेली दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. बहुतांशी नागरिकांत ताप, सर्दी, खोकला, घसादुखी यासारख्या विषाणुजन्य आजारांचा संसर्ग वाढलेला दिसतो. डासांची उत्पत्ती होऊ लागल्याने साथीचे आजार होऊ लागल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. पाण्याची डबकी हे डास उत्पत्तीचे ठिकाण आहे. अशा डबक्यातील पाणी वाहते करावे. सध्या विषाणुजन्य आजाराला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. लहान मुलांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. (नगर प्रतिनिधी)