शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रोहिणी नक्षत्राच्या पर्वावर उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम

By admin | Updated: May 23, 2017 00:22 IST

सुरु होणाऱ्या हंगामात पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक तसेच पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जापेक्षा ....

१०८ गावात जागृती : कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार होणारलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सुरु होणाऱ्या हंगामात पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक तसेच पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना खात्रीशिर मिळावे यासाठी रोहिणी नक्षत्राच्या दिवशीपासून उन्नत शेती - समृद्ध मोहिम राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाचा व योजनांची जनजागृती या मोहिमेअंतर्गत केली जाईल यासाठी तालुका कृषी अधिकारी मोहाडी कार्यालयाने तालुक्यातील १०८ गावासाठी सभेचे नियोजन केले आहे.शेतकरी खरीप हंगामाची सुरुवात रोहिणी नक्षत्रापासून करीत असतो. खरीप हंगामामध्ये लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन, कृषी तंत्रज्ञान आदींची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळाली पाहिजे. याची पूर्वतयारी करण्याच्या हेतुने तसेच शासनाच्या कृषी विषयक योजनांची माहिती प्रत्यक्षपणे गावातच दिली जाण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवाडा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी १०८ गावासाठीचे नियोजन तयार केले आहे. २५ मे ते ८ मे पर्यंत गावात सकाळी ८ ते ११ या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले. २५ मे रोजी दहेगाव, वरठी, नेरी, मुंढरी बु., खडकी, जांभोरा, हरदोली झं., कांद्री, धोप, आंधळगाव या गावातून मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. मोहिमेसाठी समन्वय अधिकारी म्हणून कृषी पर्यवेक्षक व्ही.डी. झलके, एन.के. चांदेवार, ओ.पी. भट, ए.एस. सार्वे यांची नियुक्ती करण्यात आली. तर संपर्क अधिकारी म्हणून जे.ए. आकरे, बी.एन. तिजारे, एन.डी. भोंगाडे, वाय.के. नागपुरे, डी.एम. वाडीभस्मे, वाय.जी. बारापात्रे, यु.एस. निखारे, एस.एस. वाळके, पी.ए. धापटे, पी.बी. गुंडे, एस.पी. गेडाम, पी.आर. भोयर, एस.पी. आंभोरे, डी.एन. चकोले, जी.एल. समरीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ कृषी अधिकारी आर.जी. गायकवाड, व्ही.डी. झलके आदींची मार्गदर्शक म्हणून गावनिहाय टीम तयार करण्यातआली आहे. ८ जून रोजी केसलवाडा, मोरगाव, वडेगाव व चिचखेडा येथे मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत या वर्षापासून तालुका हा कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी नियोजनाचा घटक म्हणून निश्चित करण्यात आला आहे. प्रमुख पिकांची सध्याची उत्पादकता, अनुवंशिक उत्पादन क्षमता व साध्य करावयाच्या उत्पादन वाढीचा लक्षांक याबाबत प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या सभेत माहिती दिली जाईल. लक्षांक साध्य करण्याकरिता कृषी तंत्रनाची माहिती दिली जाईल. गावस्तरावरील प्रगतशील शेतकरी, पिकस्पर्धा विजेते, शेतकरी यांचे अनुभव कथनही होईल. गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, कृषी विज्ञान मंडळ, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, बँक, आत्मा, संबंधित समित्या, कृषी संलग्नीत, ग्रामस्तरीय कर्मचारी यांचाही या मोहिमेत सहभाग केला जाणार आहे.