शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घेतले वृक्ष दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:38 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी जिल्हा प्रशासन व नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष संगोपन व संवर्धन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागानेच वृक्ष लागवड व संवर्धन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी वृक्ष दत्तक दिले.

ठळक मुद्दे८५ विद्यार्थ्यांचा सहभाग : प्रशासनाचा अभिनव उपक्रम, नगर परिषद गांधी विद्यालयात वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी जिल्हा प्रशासन व नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष संगोपन व संवर्धन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागानेच वृक्ष लागवड व संवर्धन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी वृक्ष दत्तक दिले.यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपवन संरक्षक विवेक होशिंग, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपनगराध्यक्ष आशु गोंडाणे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, वित्त व लेखा अधिकारी अशोक मातकर, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, प्राचार्या आरती गुप्ता व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्ष दत्तक देवून या उपक्रमाची सुरुवात केली. झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड व एक ट्रि गार्ड दत्तक देण्यात आले. या ट्रि गार्डवर विद्याथ्यार्चे नाव असणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केले.या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी त्या-त्या विद्यार्थ्यांवर असणार आहे. वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा प्राचार्य नियमित घेणार आहेत. वृक्षाची निगा व संवर्धन करण्याऱ्या विद्यार्थ्यांस पुढील वर्षी पारितोषिक देण्यात येणार आहे. मानवाला जीवंत राहण्यासाठी प्राणवायुची गरज आहे. प्राण वायु देण्याचे काम वृक्ष करतात. वसुंधरेने तयार केलेल्या संसाधनाचा मानव वापर करीत असला तरी प्राणवायु निर्माण करण्यासाठी लागणारे वृक्ष लावण्याचे काम मात्र होत नाही. वृक्ष दत्तक मोहिमेत वृक्ष लावा व वसुंधरेला जगवा असे संस्कार विद्यार्थ्यांवर करण्याचा उद्देश आहे. या मोहिमेत महात्मा गांधी विद्यालयातील ८५ विद्यार्थी व शिक्षकांनी स्वयंस्फूर्तेने सहभाग घेतला.निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदणे, वृक्ष व इतर साहित्य जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिले. नगर पालिकेच्या वतीने ट्रि गार्ड पुरविण्यात आले.विद्यार्थी संस्कारक्षम असतात त्यांच्यावर वृक्ष संवर्धनाचे संस्कार बालवयात केल्यास भविष्यात ते पर्यावरणाचे दूत म्हणून काम करतील या उद्देशाने विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आजच जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर आॅक्सीजनचा सिलेंडर सोबत घेवून फिरण्याची मानवावर वेळ येईल. हा धोका टाळण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लावावे म्हणून प्रशासनाने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक दिले आहे. ही झाडे आधूनिक पध्दतीने लावण्यात येणार आहे. या झाडाला पाणी देण्यासाठी प्लास्टिक बॉटलचा वापर करण्यात येणार आहे. या बॉटल झाडासोबत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. कमीत कमी पाण्यात वृक्ष संगोपन व संवर्धन हा या मागचा उद्देश आहे. वृक्ष संगोपन करण्याºया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षिसही देण्यात येणार आहे. हा उपक्रम टप्प्याटप्प्याने अन्य शाळांमध्ये राबविण्याचा मानस आहे.- विजय भाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी