शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

प्रशासकीय अधिकारी घडविण्याचा वसा!

By admin | Updated: February 22, 2016 01:02 IST

सद्यास्थितीत विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते.

शिवाजी विद्यालयात मिशन आयएएस : दर महिन्याला घेतली जाते परीक्षाहरिश्चंद्र कोरे विरली (बु.) सद्यास्थितीत विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. ही बाब हेरुन आणि भविष्यात आपल्याही शाळेतील एखादा विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून निवळावा या उद्देशाने लाखांदूर तालुक्यातील ईटान येथील शिवाजी विद्यालयात मिशन आय.ए.एस. राबविला जात आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग असून २४४ मुले आणि २३८ मुली असे एकूण ४८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेने ५ जानेवारीला स्पर्धा परीक्षा प्रेरणा शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमी अमरावतीचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी अगदी सहजसोप्या पध्दतीने आयएएस अधिकारी होणे कसे शक्य आहे? हे विद्यार्थ्यांना पटवून देवून ग्रामीण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत केला आणि त्यांना प्रेरीत केले. याप्रसंगी डॉ. काठोळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी शाळेत मिशन आयएसएस राबविण्याचे आवाहन केले.या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळालेला आत्मविश्वास आणि त्यांचा उत्साह कमी होण्यापुर्वीच शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. कोटरंगे यांनी शाळेत मिशन आयएएस राबविण्याचा संकल्प केला. यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करुन मिशन आयएएसचे नियोजन करण्यात आले. या मिशनची जबाबदारी येथील उपक्रमशील शिक्षक रामदास बेदरे यांच्याकडे सोपविण्यात आली.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दर महिन्याला ३० प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका घरुन सोडवून आणायला दिली जाते. या प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आदी क्रमांक पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. महिनाभरानंतर ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. या परीक्षेत पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक गटातून प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिली जातात.जानेवारी महिन्यात घेतलेल्या परीक्षेत माध्यमिक गटातून शारदा अशोक वैलथरे, गौरी प्रल्हाद विधाते, रुपाली देवीदास दुधकुवर तर पूर्व माध्यमिक गटातुन कुणाल नरेंद्र लेदे, प्राची वाल्मीक राऊत, शुभम गोवर्धन कुथे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून स्पर्धा परीक्षा विषयी विद्यार्थ्यांच्या मनात गोडी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.