शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

एका नायब तहसिलदारांवर साकोली तालुक्याचा कारभार

By admin | Updated: July 24, 2016 00:26 IST

इंग्रजकालीन तहसिल कार्यालय म्हणून साकोली तहसील कार्यालयाची ओळख आहे.

नागरिकांची कामे खोळंबली : तहसीलदारांवर नगरपरिषदेचे अतिरिक्त कामसंजय साठवणे साकोलीइंग्रजकालीन तहसिल कार्यालय म्हणून साकोली तहसील कार्यालयाची ओळख आहे. मात्र सध्या या कार्यालयाला ग्रहण लागले असून अधिकाऱ्याअभावी नागरिकांची कामे खोळंबली आहेत. या कार्यालयासाठी नायब तहसिलदार ही चार पदे मंजुर असताना केवळ एक तहसिलदार आहे. साकोली तालुक्यात ९६ गावे आहेत. या ९ गावांचा कारभार या तहसिल कार्यालयातून चालतो. शासनाने तहसिल कार्यालयासाठी चार नायब तहसिलदारांची पदे मंजुर केली आहेत. यात निवडणुक विभाग, तपासणी पथक व दोन सामान्य विभाग अशी चार वेगवेगळी विभाग आहेत. सदर तहसिल कार्यालय हे उपविभागाला लागुन असल्यामुळे इथे कामाचा ताण आहे. मात्र शासनाने चार नायब तहसिलदारऐवजी एकच नायब तहसीलदार देऊन साकोली तालुकावासीयांवर अन्याय केला आहे. या तहसील कार्यालयात दररोज हजारो लोक विविध कामासाठी येतात. आल्यानंतर विविध दाखले, प्रमाणपत्र, सेतु करतात. मात्र कधी तहसीलदार हजर नसतात त्यामुळे सह्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतिक्षा करावी लागते. तर कधी कधी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे परत जावे लागते. एका दाखल्यासाठी नागरिकांना दोन ते तीन दिवस चकरा माराव्या लागतात. परिणामी लोकांचा पैसा व वेळही वाया जातो. याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. सध्यास्थितीत या कार्यालयात एकच नायब तहसिलदार कार्यरत आहे. साकोली तहसिलदाराकडे या तहसिल कार्यालयाव्यतिरिक्त साकोली नगरपरिषद प्रशासकपदाचा अतिरिक्त कारभार आहे. ही नगरपरिषद नव्याने घोषित झाल्यामुळे कामाचा ताण आहे. त्यामुळे तहसिलदारांना तहसिल कार्यालयापेक्षा अधिक वेळ नगरपरिषदेकडे द्यावा लागते. त्यामुळे ना धड तहसिलचे कामे होत ना धड नगरपरिषदेचीही कामे होतात. त्यामुळे लोकांची कामे रखडलेली आहेत.मागील महिन्यापर्यंत या कार्यालयीन दोन नायब तहसिलदार कार्यरत होते पैकी नायब तहसिलदार दिनकर खोत यांना जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे एक महिन्यासाठी पाठविण्यात आले. त्यामुळे आता या कार्यालयात एकच नायब तहसिलदार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तहसिल कार्यालयाची अवस्था माहिती असुन देखील नायब तहसिलदार खोत यांना भंडारा येथे का पाठविण्यात आले. या तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार या पदाबरोबरच लिपीकाचे चार ते पाच पदेही रिक्त आहेत. त्यामुळे लिपीकावर अतिरिक्त कामाचा ताण आहे. अधिकाऱ्यांनी साकोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी नागरिकांची आहे.