शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज

By admin | Updated: June 23, 2015 01:13 IST

पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे नागरिकांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागू नये,

जिल्हा, तालुका समिती स्थापन : नियंत्रण कक्ष २४ तास सेवेतभंडारा : पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे नागरिकांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षासह सातही तालुक्यात समिती स्थापन करून अत्याधुनिक यंत्रसामुग्री व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.भंडारा जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. अतिवृष्टीमुळे नदी, नाला काठावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना याचा दरवर्षी मोठा फटका बसतो. यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या नेतृत्वात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती सज्ज झाली आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील समितीत सहा व्यक्तींसह दोन बोट चालकांचा समावेश आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नेतृत्वात समिती काम करणार आहे. या समितीत तीन होमगार्ड व गोताखोरांचे पथक राहणार आहे. या समितीत २० जणांचा समावेश आहे. नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून परिस्थितीचा सामना करण्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्ती निवारण्याच्या दृष्टिने मॉलड्रिल घेऊन उपाय योजनेसंदर्भात आढावा घेण्यात आला आहे.नदीमुळे बसू शकतो फटकावैनगंगा नदीचे पात्र मोठे असून वैनगंगा नदीसह कन्हान, सूर, बावनथडी, चुलबंद नदीमुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या जिल्ह्यातील १५४ गावातील नागरिकांना धोका पोहचू शकतो. (शहर प्रतिनिधी)मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारीपावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडतो. अशावेळी निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेकांवर संकट कोसळते. त्याची माहिती शासनापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्थ तलाठ्यांकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थान समितीकडे वेळोवेळी अहवाल सादर करावयाचा आहे.२४ तास नियंत्रण कक्षपावसामुळे नागरिकांना निर्माण होणाऱ्या आपत्तीवर मात करता यावी, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. या कक्षात कर्मचाऱ्यांची २४ तास नेमणूक करण्यात आलेली आहे. अडचणीसंदर्भात कक्षातील (०७१८४-२५१२२२) या क्रमांकावर संपर्क साधता येईल.अशा आहेत उपलब्ध सुविधा यांत्रिकी फायबर बोट ०९, रबर बोट ०१, लाईफ बॉईज ५९, लाईफ जॅकेट ६०, हेल्मेट २५, हेल्मेट विथ टॉर्च ०८, इमरजन्सी लाईट १०, अ‍ॅल्यूमिनिअम फोल्डींग स्ट्रेचर ०८, फोल्डींग तंबू ०९, फोल्डींग स्ट्रेचर ०५, सर्च लाईट ०६, इनफ्लॉन्ट टेबल इमरजन्सी लाईट ०८ आहेत.