शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:23 IST

प्रगत शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षण विभागाने आदिवासी समाजातील १५६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिक्षण विभागाचा प्रताप : १५६ विद्यार्थ्यांवर अन्याय, दोषींवर कारवाई करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रगत शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षण विभागाने आदिवासी समाजातील १५६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ३ लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती मिळावी यासाठी अन्यायग्रस्त विद्यार्थी पायपीट करीत आहेत.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला. इयत्ता पहिली ते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वर्षातील ही शिष्यवृत्ती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे वळते केले आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची ही रक्कम जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विभागाने हडप केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य उत्तमकुमार कळपाते यांनी केला आहे. शिष्यवृत्ती मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले. अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा झाली. मात्र १५६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शिक्षण विभागाने अद्यापही दिलेली नाही. नियमानुसार बँक खाते उघडल्यानंतर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा करायला हवी. मात्र शिक्षण विभागाने तसे न करता त्या रकमेची विल्हेवाट तर लावली नसावी असा संशय आता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना १ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते तर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना १५०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडावे या उद्देशाने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु केलेली आहे. मात्र शिक्षण विभागानेच या योजनेला आता सुरुंग लावण्याचा प्रकार केल्याचे यातून दिसून येत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य उत्तमकुमार कळपाते यांनी लावला आहे. विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी. या प्रकारात शिक्षणाधिकारी थोरात दोषी असून त्यांच्यासह शिक्षण विभागातील अन्य दोषींवर कारवाई करावी व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने वितरीत करावे.-उत्तमकुमार कळपाते, जिल्हा परिषद सदस्य, भंडारा.