शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:23 IST

प्रगत शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षण विभागाने आदिवासी समाजातील १५६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिक्षण विभागाचा प्रताप : १५६ विद्यार्थ्यांवर अन्याय, दोषींवर कारवाई करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रगत शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षण विभागाने आदिवासी समाजातील १५६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ३ लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती मिळावी यासाठी अन्यायग्रस्त विद्यार्थी पायपीट करीत आहेत.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला. इयत्ता पहिली ते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वर्षातील ही शिष्यवृत्ती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे वळते केले आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची ही रक्कम जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विभागाने हडप केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य उत्तमकुमार कळपाते यांनी केला आहे. शिष्यवृत्ती मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले. अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा झाली. मात्र १५६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शिक्षण विभागाने अद्यापही दिलेली नाही. नियमानुसार बँक खाते उघडल्यानंतर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा करायला हवी. मात्र शिक्षण विभागाने तसे न करता त्या रकमेची विल्हेवाट तर लावली नसावी असा संशय आता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना १ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते तर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना १५०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडावे या उद्देशाने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु केलेली आहे. मात्र शिक्षण विभागानेच या योजनेला आता सुरुंग लावण्याचा प्रकार केल्याचे यातून दिसून येत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य उत्तमकुमार कळपाते यांनी लावला आहे. विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी. या प्रकारात शिक्षणाधिकारी थोरात दोषी असून त्यांच्यासह शिक्षण विभागातील अन्य दोषींवर कारवाई करावी व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने वितरीत करावे.-उत्तमकुमार कळपाते, जिल्हा परिषद सदस्य, भंडारा.