शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी १५० कोटींची अतिरिक्त मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

भंडारा : आगामी जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात जिल्ह्यासाठी १५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ...

भंडारा : आगामी जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात जिल्ह्यासाठी १५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्याची वार्षिक नियोजन आराखडा बैठक नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री डाॅ. विश्वजीत कदम, आमदार डाॅ.परिणय फुके, आमदार अभिजीत वंजारी, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विनय मून, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते. सद्यस्थितीत जिल्हा नियोजन आराखड्यानुसार भंडाऱ्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यात येईल; मात्र जिल्हा प्रशासनाच्या वाढीव निधीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करून वेगळ्या मार्गाने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजीत पवार यांनी सांगितले. मध्यप्रदेश सरकारच्या चुकीमुळे महापुराला शेतीसह गावांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे, तसेच जिल्हा रुग्णालय इमारत, वैद्यकीय सुविधा, आरोग्य सुविधांवर खर्च करण्यासाठी अतिरिक्त निधीची आग्रही मागणी पालकमंत्री डाॅ. कदम यांनी केली.

कोरोना महामारीमुळे राज्याच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. तब्बल ७५ हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. तरीही आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यातील इतर विभागातील जिल्ह्यांच्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

बाॅक्स

शेतकऱ्यांना धानाऐवजी इतर पिकांकडे वळवा!

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन होते. त्यातून दरवर्षी येणारा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आदींमुळे मोठे नुकसान होते. सदोष गोदामामुळेही धानाचे नुकसान होते. जिल्ह्यात जलसिंचनाची सोय मोठ्या प्रमाणात असून, शेतकऱ्यांना धानपिकांऐवजी इतर पिकांकडे वळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.