शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यासाठी १५० कोटींची अतिरिक्त मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

भंडारा : आगामी जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात जिल्ह्यासाठी १५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ...

भंडारा : आगामी जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात जिल्ह्यासाठी १५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्याची वार्षिक नियोजन आराखडा बैठक नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री डाॅ. विश्वजीत कदम, आमदार डाॅ.परिणय फुके, आमदार अभिजीत वंजारी, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विनय मून, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते. सद्यस्थितीत जिल्हा नियोजन आराखड्यानुसार भंडाऱ्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यात येईल; मात्र जिल्हा प्रशासनाच्या वाढीव निधीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करून वेगळ्या मार्गाने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजीत पवार यांनी सांगितले. मध्यप्रदेश सरकारच्या चुकीमुळे महापुराला शेतीसह गावांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे, तसेच जिल्हा रुग्णालय इमारत, वैद्यकीय सुविधा, आरोग्य सुविधांवर खर्च करण्यासाठी अतिरिक्त निधीची आग्रही मागणी पालकमंत्री डाॅ. कदम यांनी केली.

कोरोना महामारीमुळे राज्याच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. तब्बल ७५ हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. तरीही आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यातील इतर विभागातील जिल्ह्यांच्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

बाॅक्स

शेतकऱ्यांना धानाऐवजी इतर पिकांकडे वळवा!

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन होते. त्यातून दरवर्षी येणारा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आदींमुळे मोठे नुकसान होते. सदोष गोदामामुळेही धानाचे नुकसान होते. जिल्ह्यात जलसिंचनाची सोय मोठ्या प्रमाणात असून, शेतकऱ्यांना धानपिकांऐवजी इतर पिकांकडे वळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.