शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी १५० कोटींची अतिरिक्त मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

भंडारा : आगामी जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात जिल्ह्यासाठी १५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ...

भंडारा : आगामी जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात जिल्ह्यासाठी १५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्याची वार्षिक नियोजन आराखडा बैठक नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री डाॅ. विश्वजीत कदम, आमदार डाॅ.परिणय फुके, आमदार अभिजीत वंजारी, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विनय मून, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते. सद्यस्थितीत जिल्हा नियोजन आराखड्यानुसार भंडाऱ्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यात येईल; मात्र जिल्हा प्रशासनाच्या वाढीव निधीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करून वेगळ्या मार्गाने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजीत पवार यांनी सांगितले. मध्यप्रदेश सरकारच्या चुकीमुळे महापुराला शेतीसह गावांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे, तसेच जिल्हा रुग्णालय इमारत, वैद्यकीय सुविधा, आरोग्य सुविधांवर खर्च करण्यासाठी अतिरिक्त निधीची आग्रही मागणी पालकमंत्री डाॅ. कदम यांनी केली.

कोरोना महामारीमुळे राज्याच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. तब्बल ७५ हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. तरीही आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यातील इतर विभागातील जिल्ह्यांच्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

बाॅक्स

शेतकऱ्यांना धानाऐवजी इतर पिकांकडे वळवा!

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन होते. त्यातून दरवर्षी येणारा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आदींमुळे मोठे नुकसान होते. सदोष गोदामामुळेही धानाचे नुकसान होते. जिल्ह्यात जलसिंचनाची सोय मोठ्या प्रमाणात असून, शेतकऱ्यांना धानपिकांऐवजी इतर पिकांकडे वळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.