शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

व्यसनमुक्त युवा पिढी ही देशाची प्रगती

By admin | Updated: February 13, 2017 00:24 IST

व्यसनाच्या आहारी गेल्याने आजची युवा पिढी जीवनातील ध्येयापासून भटकत चालली आहे.

कल्याणी भुरे यांचे प्रतिपादन : मिटेवानी येथे दारुबंदी करणाऱ्या महिलांचा सत्कारतुमसर : व्यसनाच्या आहारी गेल्याने आजची युवा पिढी जीवनातील ध्येयापासून भटकत चालली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे पालकांचेही कर्तव्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने व जनजागृतीने व्यसनमुक्त युवा पिढी तयार झाल्यास देशाची प्रगतीही निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी केले.मिटेवानी गावातील महिलांनी दारुबंदीसाठी बंड पुकारून ते यशस्वी केल्याने त्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पं.स. सदस्य मुन्ना फुंडे, सरपंच अनिता राहांगडाले, जि.प. सदस्या मरसकोल्हे, वामन राहांगडाले, आशा काळे मंचावर उपस्थित होत्या. पुढे बोलताना कल्याणी भुरे म्हणाल्या की, आपला मुलगा कुठे जातो, काय करतो, त्याचे सोबती कोण? या सर्व बाबींची माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. काय वाईट आहे, काय चांगले आहे त्या दुष्परिणाम काय हे पाल्यांना समजावून सांगितल्यास स्वत:ला सावरण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण झाल्यास ते व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत. महिलांनी ज्या प्रकारे संसार उध्वस्त होण्याच्या भीतीपोटी रणरागिनी बनल्या, तसा आत्मविश्वास जागृत ठेवून प्रत्येक क्षेत्रात सहभाग नोंदवून प्रगती भरारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.संचालन व आभार ग्रामसेवकांनी केले. कार्यक्रमात गावातील सर्वच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)