शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

सुदृढ लोकशाहीसाठी सक्रिय सहभाग आवश्यक

By admin | Updated: January 26, 2016 00:33 IST

लोकशाहीला पोषक करण्यासाठी सर्व मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रमभंडारा : लोकशाहीला पोषक करण्यासाठी सर्व मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने आजच्या स्मार्ट युगाचा विचार करून लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक पध्दतीत आमुलाग्र बदल केलेला आहे. जोपर्यंत लोकांची आस्था आहे, मतदान करायला लोक बाहेर पडतात, लोक जागरूक आहेत तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. सामाजिक न्याय भवनात आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जी.जी. जोशी, सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे, सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, लोकशाहीचे जे तत्त्व आहे, त्याचा सध्या व्यवस्थित वापर होताना दिसत नाही. निवडणुकीत वाईट मागार्चा वापर हा कोणत्याही लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही प्रक्रियेत बदल घडविण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘भारतीय सांसदीय लोकशाही कालबाह्य ठरली आहे किंवा नाही’ या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम वनवे हा विषयाच्या बाजुने प्रथम तर जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिल चांदेवार हा विषयाच्या विरोधात प्रथम ठरला. ओम सत्यसाई महाविद्यालयाचा विद्यार्थी मयुर बांगरे हा विषयाच्या विरूद्ध बाजुने द्वितीय तर आठवले महाविद्यालायचा विद्यार्थी अमित रामटेके हा विषयाच्या विरोधात द्वितीय ठरला. यावेळी घोषवाक्य स्पर्धेत जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूनम खोकले, नंदिनी सोनवाने, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संजय भारसाकळे व अर्चना देशमुख विजयी ठरले. वादविवाद स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धेचे परिक्षण नीळकंठ रणदिवे, नंदकिशोर परसावार, मनोज दाढी यांनी केले. लोकसभा व विधानसभा निवडणूक २०१४ च्या प्रक्रियेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन या कार्यक्रमात लावण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सुधारित मतदार यादीचे वाटप करण्यात आले. १८ वर्षावरील नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी उपस्थितांना शपथ दिली. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे यांनी केले. संचलन तहसिलदार सुशांत बनसोडे यांनी तर आभारप्रदर्शन नायब तहसिलदार थोरवे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)