शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

महिनाभरात ३०५ वाहनधारकांविरुध्द कारवाई

By admin | Updated: July 6, 2015 00:36 IST

शहरातील गजबजलेल्या व वर्दळीच्या मार्गावर बेशीस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी

४५ हजारांचा दंड वसूल : बेशिस्त वाहन चालकांना लगाम, पार्किंगसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरजभंडारा : शहरातील गजबजलेल्या व वर्दळीच्या मार्गावर बेशीस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलीस विभागातर्फे ३ जून पासून विशेष मोहीम राबविली जात आहे.या अंतर्गत महिन्याभरात ३०५ जणांवर कारवाई करण्यात आली. एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, अरुंद रस्ते, सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी, तुरळक अपघात अशी एकूणच शहरातील रहदारीचे व वाहतूक व्यवस्थेचे चित्र आहे. शहरातील गांधी चौकापासून बसस्थानक परिसरापर्यंत मुख्य मार्ग गेलेला आहे. याच मार्गावर गांधी चौकात गुजरी यालाच छोटा बाजार असे संबोधले जाते. नगरपालिका, पोलीस ठाणे, जिल्हा बँक तसेच समोर किराणा व कापड बाजार आहे. या मार्गावर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. बसस्थानक व जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयामध्ये जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. शालेय विद्यार्थी, कर्मचारी व अन्य नागरिक याच मार्गाने मोठ्या प्रमाणात रहदारी करतात. मोठ्या बाजारापासून गांधी चौकापर्यंतच्या मार्गावर दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ग्रामीण भागातून तसेच शहरातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची या दुकानांमध्ये नेहमीच गर्दी असते. परंतु दुचाकी व कारने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पार्कींगची व्यवस्था नसल्याने भर रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने अस्ताव्यस्त उभी करून ठेवली जातात. या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी व अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून वाहतूक पोलीस विभागातर्फे ३ जून पासून विशेष मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यात रस्त्यावर बेशीस्तपणे उभ्या ठेवल्या जाणाऱ्या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली. तीन आसनी आॅटो व गाड्यांना जॅमर लावून चालकाकडून ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर रस्त्यावर आढळलेल्या दुचाकींना जॅमर लावण्यानंतर टोविंगची कारवाई करून दुचाकी चालकावर दीडशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूकीचा अडथळा व अपघात होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहन उभे करून ठेवल्याप्रकरणी १०० रुपये दंड तर वाहन जप्त केल्याप्रकरणी ५० रुपये असा दीडशे रुपये दंड आकारण्यात आला. वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून काही त्रुटी आढळल्यास अधिक दंड वसुल केल्या जात आहे. दोन पोलीस कर्मचारी या मोहीमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. कंत्राटी तत्वावर वाहन उचलण्याचे काम दिले जात आहे. दुचाकी प्रमाणेच चारचाकी वाहनचालकांवरही अशा प्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु वाहतुक पोलीस विभागाकडे क्रेनची व्यवस्था नाही. अपघातग्रस्त वाहने उचलण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करून गृहविभागाकडे क्रेनची मागणी करण्यात आली. दोन वर्षापासून ही मागणी पूर्ण झालेली नाही. टोविंगची कारवाई करण्यापूर्वी शिट्टी वाजवून चालकांना पूर्व सूचना दिली जाते. परंतु तरीही दुर्लक्ष करणाऱ्या चालकांची वाहने उचलली जातात. काही दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर ही मोहीम राबविली जाणार आहे. वाहने उचलण्याची कारवाई सुरु झाल्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करून ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये बरीच सुधारणा झाल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)शहरात पार्किंगचा अभावशहरातील मुख्य बाजारपेठेत कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. या मार्गावर मोठे मोठे व्यापारी संकुले आहेत. खासगी इमारती, बँका व सरकारी कार्यालयासाठी ही संकुले भाड्याने दिली आहेत. परंतु एकाही ठिकाणी पार्कींगची व्यवस्था नाही. येथे येणारे नागरिक आपली वाहने सुरक्षितपणे उभी ठेवण्यासाठी जागा नसल्याने ती वाहने रस्त्यावर उभी ठेवतात. त्यानंतर अशा वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. कारवाईनंतर व्यापारी या विषयावर ब्र सुद्धा काढत नाही. मग वाहनचालकांनी वाहने कुठे ठेवावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मार्गावर स्वत: नगरपालिकेमार्फत बीओटी तत्वावर बांधलेले व्यापारी संकुल आहे. तिथेही वाहनतळ नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्या काळात बेधडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मोठ्या बाजारातील शंभर मिटरच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते. या जागेवर पार्कींगची व्यवस्था झाल्यास नागरिकांना सोईचे झाले असते. परंतु पालिकेच्या अनास्थेमुळे ही समस्या अद्याप कायम आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी वाहतूकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.