शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वरठीच्या महिला सरपंच झाल्या अपात्र- अपर आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST

वरठी येथील सामाजिक कार्यकर्ता बाबुलाल बोन्द्रे यांनी या प्रकरणात अपर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी ...

वरठी येथील सामाजिक कार्यकर्ता बाबुलाल बोन्द्रे यांनी या प्रकरणात अपर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपर आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांच्याकडे प्रकरण दाखल केले. यात सरपंच श्वेता अरविंद येळणे यांनी नियमबाह्य कार्य व शासकीय निधीचा अपहार करून कर्तव्यात कसूर करीत शासनाची दिशाभूल केली, असा ठपका ठेवण्यात आला. धोरणात्मक व विकासात्मक कामे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या विषय सूचीवर न घेता शासन नियमांना डावलून बांधकाम साहित्य व इतर साहित्य खरेदी निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे आरोप चौकशीत सिद्ध झाले. पाणी पुरवठा योजनेत तुरटी खरेदी प्रक्रिया सदोष असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणात दोन्ही पक्षांचे लेखी व मौखिक युक्तिवाद अवलोकन केल्यावर या प्रकरणात सरपंच श्वेता येळणे पदाचा गैरवापर केल्याचा सिद्ध झाले. सरपंच पदावरून अपात्र करण्याचा निर्णय अपर आयुक्तांनी दिला आहे. या निर्णयाने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला असून, राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला १५ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, दावे-प्रतीदाव्यात हे दिवस सुरळीत निघून जातील, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

बॉक्स

न्यायालयात दाद मागणार

तक्रार व चौकशी यात राजकीय सूडबुद्धी व दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात आलेले निर्णयाचे स्वागत आहे. अपर आयुक्तांचे निर्णय अंतिम नाही. या निर्णयाला न्यायालयात आवाहन देणार आहे. अद्याप निर्णयाची प्रत मिळालेली नाही. पण लवकरच याप्रकरणी न्यायालयात दाद मागून शासन दरबारी न्याय मागणार आहे. आमची राजकीय पार्श्वभूमी नाही त्यामुळे अकारण बळी पडलो आहे. पण पुढील निर्णयात मला नक्की न्याय मिळेल, अशी आशा असल्याची माहिती सरपंच श्वेता येळणे यांनी दिली.