शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

ग्रामस्तरावरील कोरोना दक्षता समित्यांची कारवाई शन्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST

ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीपुढे कारवाई कशी करावी, असा मोठा प्रश्‍न आहे. गावात एखादा कोरोना पॉझिटिव्ह अथवा त्याचे ...

ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीपुढे कारवाई कशी करावी, असा मोठा प्रश्‍न आहे. गावात एखादा कोरोना पॉझिटिव्ह अथवा त्याचे नातेवाईक बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, कोणीही दुश्मनी घेण्यास तयार नाही. गावातील राजकारण व प्रत्यक्ष ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सोबत नसल्याने आपण कोणा कोणाची दुश्मनी घेणार, असा प्रश्न ग्राम समितीत असणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांना पडत आहे. आजही कोरोना मृतांचा ग्रामीण भागातील आकडा चिंताजनक दिसत आहे. अनेक ठिकाणी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही, ही गंभीर बाब आहे. भंडारा तालुक्यातील काही गावात तर काहीजण चौकात गप्पा मारतानाचे चित्र आहे. सभेच्या बहाण्याने अनेकजण एकत्र येत आहेत. मात्र, या समित्या कारवाई करत नसल्याने या कोरोना दक्षता समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बॉक्स

मुख्यालयी राहणे बंधनकारक करा

भंडारा तालुक्यातील अनेक गावे रेडझोनमध्ये आली आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भंडारा पंचायत समितीचे बीडीओ यांनी ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. स्वतःमुळे इतरांचा जीव धोक्यात येणार नाही, यासाठी जोपर्यंत नागरिक पुढाकार घेणार नाहीत तोपर्यंत कोरोना संसर्ग कमी होणार नाही.

बॉक्स

कारवाई होत नसल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ

स्वतःमुळे इतरांचा जीव धोक्यात घालत अनेकजण ग्रामीण भागात फिरत आहेत. अशांवर ग्रामस्तरावरील कोरोना दक्षता समित्यांची कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने कारवाई नेमकी करायची कुणी असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटीलही पुढे होऊन कुणी रोष पत्करावा असे म्हणत असून यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी भागातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होण्यासाठी ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करणे गरजेचे झाले आहे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून अनेकदा कारवाया होतात. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या प्रमाणात कारवाया होत नसल्याचे चित्र आहे.