शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

करडीत अतिसाराची लागण

By admin | Updated: February 1, 2016 00:33 IST

करडी गावात मागील २० दिवसांपासून जवळपास २०० लोकांना पाण्यापासून होणाऱ्या आजारांची लागण झाली आहे.

नाल्या घाणीने तुंबलेल्या : पाणी वापरण्यास मनाईकरडी/पालोरा : करडी गावात मागील २० दिवसांपासून जवळपास २०० लोकांना पाण्यापासून होणाऱ्या आजारांची लागण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या चाचणीत पाणी दूषित आढळून आल्याने पिण्यासाठी वापरण्यास मनाई करण्याचे पत्र ग्रामपंचायतीला देण्यात आले. ग्रामपंचायतीने चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन उपाय योजना न करता मलाईदार कामात लक्ष घालत असल्याची चर्चा आहे.करडी सुमारे ५ ते ६ हजार लोकसंख्येचे गाव असून व्यापारी पेठ म्हणूनही ओळखली जाते. काही वर्षापूर्वी गावाला हागणदारी मुक्त गावाचा पुरस्कार सुध्दा मिळाला आहे. परंतू गावाची शौचालयाची समस्या अजुनही सुटलेली नाही. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, शेतांमध्ये शौचास जातांना दिसतात. गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शाळेजवळ बांधलेल्या पाणी पुरवठा योजनेतून होत आहे. दोन वर्षापुर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सुमारे १६ लाखांचा निधी जि.प. कडून देण्यात आला होता. पाईप लाईनचे काम त्यातून करण्यात आले. परंतु गावात अजूनही जलवाहिनी कमकुवत आहेत. गावातील नाल्या घाणीने माखलेल्या आहेत. घाण स्वच्छ करण्याचे काम ग्रामपंचायतीचे असतांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप आहे.जलवाहिनी अनेक ठिकाणी नादुरुस्त आहे. परिणामी नाल्यातील दूषित पाणी जलवाहिनीमध्ये शिरुन पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जंतमिश्रीत दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची मोठ्या प्रमाणात लागन झाली आहे. अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात करडी गावातून यायला लागल्याने करडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील विविध भागातून पाण्याचे नमुने घेतले. पाणी पिण्यासाठी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील विविध भागातून पाण्याचे नमुने घेतले असता पाणी पिण्यासाठी अयोग्य आढळून आले. तसा अहवाल त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे दिला. ग्रामपंचायत प्रशासनाने अहवालाची दखल घेत चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. गावात जवळपास १५० ते २०० नागरिक हगवण, उलटी व अन्य आजारांनी त्रस्त असून प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहेत. गावातील नाल्या घाणीने बुजलेल्या आहेत. नाल्या स्वच्छ केल्या जात नाही. मागील वेळी सुध्दा गावात दूषित पाण्यामुळे अतिसार व अन्य रोगांची लागण झाली होती. ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. परंतु प्रशासनाने यातून धडा घेतलेला दिसत नाही. सुमारे १५ ते २० दिवसांपासून गावात २०० लोकांना अतिसाराची लागन झाली आहे. वैद्यकीय अहवाल ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. नागरिक त्रस्त आहेत. आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असतांना प्रशासन मात्र मलाईदार कामात व्यस्त आहे. (वार्ताहर)वैद्यकिय अहवाल प्राप्त होताच गावातील पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला. गावातील विहिरीत व शेतातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीत ब्लिचींग पावडर टाकण्यात येऊन पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. नाल्यातून गेलेल्या जलवाहिन्या लिकेज आहेत. त्यामुळे लिकेज दुरुस्तीचे व दूषित पाण्याचे स्रोत शोधण्याचे काम सुरु आहेत. नव्याने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.- युवराज कुथे, ग्रामविकास अधिकारी करडीकरडी गावातील अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने पाण्याचे नमुने विविध ठिकाणावरुन तपासण्यात आले. नमुने दूषित आल्याने तसा अहवाल ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आला. रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.- अंशुल गभणे, वैद्यकीय अधिकारी, करडी