शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

वृत्तपत्रातील अचूक, विश्वसनीय माहितीमुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

कोट १ वृत्तपत्रातून अचूक आणि विश्वसनीय माहिती तर मिळतेच. मात्र आज भंडाऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्यातून राज्यस्तरावर तीन शेतकऱ्यांनी राज्य स्तरावर ...

कोट

१ वृत्तपत्रातून अचूक आणि विश्वसनीय माहिती तर मिळतेच. मात्र आज भंडाऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्यातून राज्यस्तरावर तीन

शेतकऱ्यांनी राज्य स्तरावर राज्य पुरस्कार प्राप्त केले. यासाठी कृषी विभागासोबतच लोकमतने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करीत, नवनवीन माहिती देत नेहमीच शेतकऱ्यांच्या पंखातही बळ देण्याचे काम केले आहे.

मिलिंद लाड,

उपविभागीय कृषी अधिकारी

कोट २

समाजातील सर्वच घडामोडींचे वास्तव चित्र मांडणारे वृत्तपत्र म्हणून लोकमतने चांगला नावलौकिक कमावला आहे. कोरोना संसर्गाची भीती कमी करण्यापासून सोशल मीडियावरील फसव्या अफवांपासून नागरिकांना सावध ठेवण्यासाठी लोकमतने कठीण काळातही समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. सर्व सामान्यांपासून ते समाजातील तळागाळातील लोकांसाठी लोकमतची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहते. कार्यालय असो किंवा नसो मी आजही नियमित लोकमत वृत्तपत्राचे वाचन आवर्जून करतोच.

विजय नंदागवळी,

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, भंडारा.

कोट ३

मोबाईलच्या अतिवापराने दुष्परिणाम होतात. वृत्तपत्र वाचनातून वाचकांना खरी माहिती मिळत असल्याने अनेकांच्या मनातील संभ्रम दूर होतात. त्यामुळे आजही माझ्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनानेच होते. वृत्तपत्रातून सकारात्मक, यशाचे शिखर गाठणाऱ्या यशोगाथा वाचायला मिळतात. त्यामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. सकाळ झाली की लोकमतची आठवण होतेच.

प्रदीप म्हसकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रंण निरीक्षक, भंडारा

कोट ४

कोरोनाचा सर्वच व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र तरीही शेती व्यवसायामध्ये होत असलेल्या आमूलाग्र बदलांमध्ये तसेच भाजीपाला क्षेत्रात वाढ होण्यास लोकमतच्या यशोगाथांनी शेतकऱ्यांचे मन जिंकले आहे. यासोबतच खरी अचूक माहिती व सर्वसान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकमतने नेहमीच प्राधान्य दिले आहे. दररोज सकाळी नियमितपणे लोकमतचे वाचन करणे ही माझी नित्याची सवय बनली आहे.

शांतीलाल गायधने, तंत्र अधिकारी, कृषी उपविभाग, भंडारा