शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कुणाच्या मते सक्षम तर कुणी म्हणतो खायीत लोटणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

देशात सक्षम व्यवस्था कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात एक लाख ३१ हजार कोटी ओतण्यात आले. तर रेल्वेसाठी एक लाख १० ...

देशात सक्षम व्यवस्था

कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात एक लाख ३१ हजार कोटी ओतण्यात आले. तर रेल्वेसाठी एक लाख १० हजार कोटी व मूलभूत सुविधांसाठी एक लाख १८ हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळेच देशात सक्षम व्यवस्था निर्माण होणार आहे. यासह सक्षम आरोग्य व्यवस्थाही उभी ठाकली आहे. आत्मनिर्भर भारताला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे.

- सुनील मेंढे, खासदार, भंडारा.

लोकाभिमुख अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात कृषी, रस्ते, रेल्वे, मेट्रो यासह गावांसाठी कल्याणकारी योजनांवर भरीव तरतूद करण्यात आली आहे. वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. ग्रामीण सुधारणांचा हा प्रयत्न आहे. विकासाचा दर उंचावणारा व सर्व क्षेत्राला संतुलित, प्रगतीसाठी चालना देणारा असा हा अर्थसंकल्प असून लोकाभिमुख आहे.

- डॉ. परिणय फुके, आमदार

विकासाकडे नेणारा

ग्रामीण क्षेत्र निर्माणअंतर्गत ४० हजार कोटी, ॲग्रो क्रेडिटसाठी १६.५ लाख कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला आता ठरलेल्या मजुरीवर शेड्युलमध्ये काम करू शकतील. कोरोना व्हायरससाठी निधीची सोय आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेले आजचे बजेट सर्वसामान्यांसह भारतीयांना विकासाकडे घेऊन जाणारे आहे.

- चरण वाघमारे, माजी आमदार

विश्वासदर्शक बजेट

लोकसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प निश्चितपणे विकासाकडे घेऊन जाणारा आहे. आरोग्य, शेती, महामार्ग निर्मिती यावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना कर रिटर्न भरण्यातून सूट देण्यात आली आहे. तसेच कर स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. अर्थमंत्र्यांनी सादर केलेले हे बजेट खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी विश्वासदर्शक आहे.

- मुकेश थानथराटे, महामंत्री भाजप

देश विकणारे बजेट

खासगीकरणाअंतर्गत शासकीय कंपन्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पेट्रोल व डिझेलवर कृषीसेस अंतर्गत वाढ झाल्याने हमखासपणे महागाई वाढणार आहे. तरुणांसाठी तथ्यहीन असा हा अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर करून देश विकण्याकडे वाटचाल सुरू केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

- मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

देशाला अधोगतीकडे नेणारा

वित्तमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारा आहे. केंद्र सरकार राज्याचे ३८ हजार कोटी जीएसटी देणे बाकी आहे. ते सोडून केंद्र सरकार निवडणूक होणाऱ्या राज्यांवर खैरात वाटत आहे. राजकीय हेतू समोर ठेवून हे बजेट सादर केले असून, देशाला अधोगतीकडे नेणारे ठरणार आहे.

- गौरीशंकर मोटघरे, महासचिव काँग्रेस.

कंबरडे मोडणारे बजेट

मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महागाई वाढीला चालना देणारे असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. सर्वच क्षेत्रांत सर्वांचीच निराशा झाली आहे. लोकाभिमुखपेक्षा स्वहित असे हे बजेट आहे.

- नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष रा. काँ.