शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोवणीच्या कामास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:21 IST

जुलै महिन्यात २० ते २५ दिवसांत पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गत चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे.

ठळक मुद्देजलसाठ्यात किंचित वाढ : संततधार पावसाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जुलै महिन्यात २० ते २५ दिवसांत पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गत चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाने व सिंचन सुविधांमुळे धान पिकाच्या रोवणीस काही प्रमाणात वेग आला आहे.भरपूर पावसाचे समजले जाणारे आर्द्रा व पुनर्वसू हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने शेतजमिनील धान पºहे करपण्यास सुरूवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात पाऊस बरसला. गत पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदी जलसाठ्यात किंचीत वाढ झाली आहे. जलसाठ्यात पाणी वाढल्यामुळे याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतीक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा-अर्चा करून वरूण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात येत होते. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर २५ जून पासून पाऊस सुरू झाला. संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले, त्यांचे पºहे सुध्दा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील भंडारा, लाखनी, साकोली, लाखांदूर, मोहाडी व तुमसर तालुक्यासह अनेक ठिकाणच्या शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठे शेतकरी बाहेरगावावरून स्वत:च्या ट्रॅक्टरने महिला व पुरूष मजूर गावात आणून रोवणीच्या कामास वेग दिला आहे. ज्या गावात बहुतांश लोकांकडे शेतजमीन आहे, असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास मजूर म्हणून जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजुराचा आधार घेतला जात आहे.ट्रॅक्टरचे भाडे वाढलेधानपीक रोवणीसाठी चिखलणी करणे आवश्यक असते. ट्रॅक्टरने चिखलणीसाठी ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहे. ट्रॅक्टर मालकांना आता रोवणीच्या निमित्ताने सुगीचे दिवस आले आहे. झटपट रोवणी उरकण्यासाठी अनेक शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. दोन वर्षात ट्रॅक्टरचे भाडे वाढले आहे.

टॅग्स :agricultureशेती