शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:00 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही तालुक्यातील धानपिकांसह रबी पिकाला मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी आर्त हाक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही तालुक्यातील धानपिकांसह रबी पिकाला मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी रात्री १०.५० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यात भंडारा, साकोली व पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे वाटाणा, हरभरा, उळीद, मुंग, लाख, लाखोरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारला गणतंत्र दिवस व रविवार सुटीचा दिवस असल्याने अवकाळी पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.तुमसर येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात अवकाळी पावसामुळे रबी पिकांसह धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाकाडोंगरी व आष्टी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे नाकाडोंगरी येथील धान केंद्र हाऊसफुल्ल झाले असून बारदाना उपलब्ध नाही. परिणामी केंद्रावरील धान उघड्यावर असल्याने ते पूर्णत: अवकाळी पावसात भिजले. शुक्रवार रात्रीही पाऊस बरसल्याने पोत्यातील धान मोठ्या प्रमाणात खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली. या धान खरेदी केंद्रात पाथरी, लोभी, आष्टी, बावनथडी, कवलेवाडा, हमेशा, घानोड, सक्करधरा, चिखला, धुटेरा, खंदाड, राजापूर, गुढरी, सीतासावंगी, पवनारखारी यासह शेतकऱ्यांनी या केंद्रावर धान विक्रीसाठी आणले होते. मात्र आता त्यांंना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही राजापूरचे माजी सरपंच वसंत बिटलाय यांनी दिला आहे.पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात बरसलेल्या पावसामुळे रबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाख, लाखोरी, वटाणा, हरभरा, गहू, मुग पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकरी बोलून दाखवित आहेत.जिल्ह्यात शनिवारी सरासरी ३१.६ मि.मी. पाऊस बरसला. यात भंडारा ९७.२, पवनी १७०.५, साकोली ६६.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. याच तालुक्यामध्ये नुकसान जास्त झाल्याची भीती व्यक्त होत आहे.