शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

रबी पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:00 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही तालुक्यातील धानपिकांसह रबी पिकाला मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी आर्त हाक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही तालुक्यातील धानपिकांसह रबी पिकाला मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी रात्री १०.५० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यात भंडारा, साकोली व पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे वाटाणा, हरभरा, उळीद, मुंग, लाख, लाखोरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारला गणतंत्र दिवस व रविवार सुटीचा दिवस असल्याने अवकाळी पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.तुमसर येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात अवकाळी पावसामुळे रबी पिकांसह धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाकाडोंगरी व आष्टी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे नाकाडोंगरी येथील धान केंद्र हाऊसफुल्ल झाले असून बारदाना उपलब्ध नाही. परिणामी केंद्रावरील धान उघड्यावर असल्याने ते पूर्णत: अवकाळी पावसात भिजले. शुक्रवार रात्रीही पाऊस बरसल्याने पोत्यातील धान मोठ्या प्रमाणात खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली. या धान खरेदी केंद्रात पाथरी, लोभी, आष्टी, बावनथडी, कवलेवाडा, हमेशा, घानोड, सक्करधरा, चिखला, धुटेरा, खंदाड, राजापूर, गुढरी, सीतासावंगी, पवनारखारी यासह शेतकऱ्यांनी या केंद्रावर धान विक्रीसाठी आणले होते. मात्र आता त्यांंना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही राजापूरचे माजी सरपंच वसंत बिटलाय यांनी दिला आहे.पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात बरसलेल्या पावसामुळे रबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाख, लाखोरी, वटाणा, हरभरा, गहू, मुग पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकरी बोलून दाखवित आहेत.जिल्ह्यात शनिवारी सरासरी ३१.६ मि.मी. पाऊस बरसला. यात भंडारा ९७.२, पवनी १७०.५, साकोली ६६.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. याच तालुक्यामध्ये नुकसान जास्त झाल्याची भीती व्यक्त होत आहे.