शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:00 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही तालुक्यातील धानपिकांसह रबी पिकाला मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी आर्त हाक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही तालुक्यातील धानपिकांसह रबी पिकाला मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी रात्री १०.५० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यात भंडारा, साकोली व पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे वाटाणा, हरभरा, उळीद, मुंग, लाख, लाखोरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारला गणतंत्र दिवस व रविवार सुटीचा दिवस असल्याने अवकाळी पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.तुमसर येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात अवकाळी पावसामुळे रबी पिकांसह धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाकाडोंगरी व आष्टी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे नाकाडोंगरी येथील धान केंद्र हाऊसफुल्ल झाले असून बारदाना उपलब्ध नाही. परिणामी केंद्रावरील धान उघड्यावर असल्याने ते पूर्णत: अवकाळी पावसात भिजले. शुक्रवार रात्रीही पाऊस बरसल्याने पोत्यातील धान मोठ्या प्रमाणात खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली. या धान खरेदी केंद्रात पाथरी, लोभी, आष्टी, बावनथडी, कवलेवाडा, हमेशा, घानोड, सक्करधरा, चिखला, धुटेरा, खंदाड, राजापूर, गुढरी, सीतासावंगी, पवनारखारी यासह शेतकऱ्यांनी या केंद्रावर धान विक्रीसाठी आणले होते. मात्र आता त्यांंना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही राजापूरचे माजी सरपंच वसंत बिटलाय यांनी दिला आहे.पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात बरसलेल्या पावसामुळे रबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाख, लाखोरी, वटाणा, हरभरा, गहू, मुग पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकरी बोलून दाखवित आहेत.जिल्ह्यात शनिवारी सरासरी ३१.६ मि.मी. पाऊस बरसला. यात भंडारा ९७.२, पवनी १७०.५, साकोली ६६.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. याच तालुक्यामध्ये नुकसान जास्त झाल्याची भीती व्यक्त होत आहे.