शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

साथीच्या आजारांचे थैमान

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

वातावरणातील बदलामुळे काही दिवसांपासून तालुक्यात साथीच्या आजाराची लागण झाली आहे.

आरोग्य यंत्रणा कुचकामी : खासगी रुग्णालयात रूग्णांची गर्दी भंडारा : वातावरणातील बदलामुळे काही दिवसांपासून तालुक्यात साथीच्या आजाराची लागण झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव आर्थिक भुर्दंडसहन करत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात पावसाचा पत्ता नाही. त्यातच दमट वातावरण, प्रचंड उकाडा आणि सातत्याने वातावरणात बदल होत आहे. याच नैसर्गिक परिस्थितीमुळे वेगवेगळे आजारही तोंड वर काढत आहे. खोकला, सर्दी, ताप, मलेरिया, अतिसार, हगवण आदी आजारांनी अबालवृद्ध त्रस्त झाले आहे. तालुक्यातील मुळावा, थेरडी, सोनदाबी, विडूळ, ढाणकी, कोरटा या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ उपकेंद्रांमध्ये रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. भंडारासह तुसमर, साकोली, लाखनी, पवनी शहरातील खासगी रुग्णालयामध्ये व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विविध आजारांवर उपचार करून घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज ४०० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे. सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला व तापाचे आहे. लहान मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्येही सर्दी, ताप, खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. रुग्णालयात काही प्रमाणात निमोनियाचेही रुग्ण आढळून आले. बहुतांश रुग्ण हे ‘व्हायरल फिवर’चे असल्याचे दिसून आले. तालुक्यात पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागात रस्त्यालगत व गटारामध्ये पाणी साचल्याने नागरिकांकडे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. उल्लेखनीय म्हणजे वृद्ध व लहान मुलांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या पावसाअभावी सर्वत्र दमट वातावरण दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे विविध आजार उद्भवत आहे. तालुक्यातील अनेक गावात विहिरीमध्ये पाणी साचले आहे. परंतु या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकलीच जात नाही. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होतो. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे कोणतेही लक्ष नाही. सर्वसामान्य नगारिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)