शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

आंबागड किल्ला विकासापासून कोसो दूर

By admin | Updated: July 1, 2016 00:49 IST

सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक आंबागड किल्ला उपेक्षीत असून विकासापासून कोसो दुर आहे.

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : किल्ल्याचे काम कासवगतीनेविलास बन्सोड उसर्रा सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक आंबागड किल्ला उपेक्षीत असून विकासापासून कोसो दुर आहे.इ.स. १७०० च्या सुमारास सदर किल्ला तयार करण्यात आला. गोंडराजा बख्तबुलंद यांच्या कारकीर्दीत त्यांचा शिवनी येथील राजखान नामक पठाण सुभेदाराने राजे बख्त बुलंद यांच्या आदेशाने सदर किल्ला उभारला. गोंडानंतर हा किल्ला भोसले यांच्याकडे आला. त्यावेळी या किल्ल्याचा उपयोग तुरुंगाप्रमाणे करण्यात येत होता. आणि या किल्ल्यात कैदी डांबल्यानंतर तेथील विहीरीचे घाणेरडे, साचलेले पाणी कैद्यास प्यावे लागे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडूनते मृत होत असत अशी या किल्ल्याविषयी आख्यायिका आहे. किल्ले स्थापत्य प्रकारापैकी हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारातील आहे. या किल्ल्यास एकच मुख्य प्रवेशद्वार असून त्यास महादरवाजा म्हणून ओळखले जाते. दरवाजा त्रिकोणी कमानयुक्त असून नक्षी आणि पिंपळ पानाच्या नक्षीने अलंकृत आहे. कमालीच्या वरच्या दोन्ही बाजूस दोन कमळ कोरली आहेत. मुख्य दरवाज्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रक्षकांच्या खोल्या निर्मित केल्या आहेत. आंबागड किल्ला दोन स्वतंत्र भागात बांधल्या असून किल्ला व बालेकिल्ला असे त्याचे दोन भाग आहेत. बालेकिल्ल्यात राजघराण्याशी संबंधीत व्यक्तीचे निवास करण्याची जागा आणि मसलत खाना, दारुगोळा, धान्य कोठार इत्यादी वस्तु आहेत. तसेच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केली आहे. बालेकिल्ला वगळून इतर परिसरात अधिकाऱ्यांची निवासस्थाने विहिरी आणि बांधीव तळी आहेत. याशिवाय हत्तीखाना म्हणून एक प्रसिध्दीस्थळ आहे. किल्ल्याच्या तटबंदीस एकुण नऊ बुरुज असून बालेकिल्ल्याच्या तटबंदीत दोन बुरुज आहेत. यापैकी किल्ल्याच्या तटभिंतीस चार टेहाळणी बुरुज असून बुरुजावर तोफ ठेवली जात असे. एकंदरीत आंबागड किल्ला हा विदर्भातील उत्तम गिरीदुर्ग असून उत्तर मध्ययुगीन काळातील स्थापत्यांचे उत्तम उदाहरण आहे. हा किल्ला सध्या उपेक्षीत आहे.पर्यटकांच्या संख्येत वाढनिसर्गरम्य आंबागड किल्ला व त्या सभोवताल असलेला आंबागड तलाव पर्यटकांचे आकर्षन केंद्र ठरला आहे. या तलावातून शेकडो एकर शेती सिंचनाखाली आहे. अशातच आंबागड किल्ला पर्यटकांच्या गळ्यातील जणू ताईतच बनला आहे. दिवसेंदिवस येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. किल्ल्याचा उत्तर दिशेला शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या महत्वाकांक्षी जीवनदायी बावनथडी अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे हा भाग जणू स्वर्गच आहे.सध्या पावसाळा सुरु झाला असून हिरव्यागर्द शालूंनी पांघरलेल्या आंबागड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या कमालीची वाढत आहे. पुरातत्व विभाग यांनी सदर किल्ल्याकडे जास्त निधी उपलब्ध करुन दिल्यास किल्ल्याचे कायापालट नक्की होईल यात काही शंका नाही.